दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालन्यात धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेह तीच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळ परिसरात शोककळा पसरली आहे.
कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या मुलाचा डाव्या कालव्यात बुडून दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना अंबड तालुक्यातील दह्याळा गावात घडली आहे. वंदना रवींद्र गारुळे वय ३५, सार्थक रवींद्र गारुळे वय ९,असं मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे
या घटनेतील मुलाचा मृतदेह सापडला असुन आईच्या मृतदेहाची शोध मोहीम सुरू आहे. ही घटना 3 मे रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दह्याळा येथे दुपारी 4 वाजता घडली आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
वंदना रवींद्र गारुळे ह्या नातेवाईकांच्या लग्नावरून परतल्यानंतर आपल्या मुलासह कपडे धुण्यासाठी बुधवारी सायंकाळी चार वाजता दह्याळा गावातून वाहणाऱ्या पैठणच्या डाव्या कालव्यात गेल्या होत्या. यावेळी आई वंदना धुणे धुत असताना सार्थक खेळण्यासाठी कालव्यात उतरला. यावेळी कालव्यात खेळता खेळता त्याचा पाय घसरला. यावेळी त्याला वाचवायला आई वंदना गेली असता दोघेही कालव्याच्या पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांसह नातेवाईकांने त्यांचा शोध घेतला असता सार्थकचा मृत्यूदेह काल दुपारी तर वंदना यांचा मृत्यूदेह आज सकाळी सापडल्याने दह्याळा गावात शोककळा पसरली असून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केला जात आहे.