दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम जिल्हा – वसंत खडसे
वाशिम : ग्रामीण भागातील गाव, खेडे, वाडी, वस्त्यातील नागरिकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर विविध योजना राबवित आहे त्याच उद्देशाने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि दीर्घकालीन आधारावर मुबलक प्रमाणात शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून, केंद्र शासनाने राज्य शासनाच्या भागीदारीतून जल जीवन मिशन ही महत्त्वकांक्षी योजना सन २०१९ पासून सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातील शेलुखडसे येथे एक कोटी ३८ लाख रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन भर जहागीर सर्कलचे कर्तव्यदक्ष जिल्हापरिषद सदस्य अमित पाटील खडसे यांच्या हस्ते झाला असल्याची माहिती सरपंच प्रतिनिधी तथा ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल उद्धव पारडे यांनी दिली आहे.
नजीकच्या एकलासपूर शिवारात असलेल्या जिल्हा परिषदेच्या संग्राहक तलावातून या योजनेचा पाणीपुरवठा होणार असून, गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिव्यक्ती किमान ५५ लिटर पाणी मिळेल अशी ही योजना आहे. घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि सर्वकाळ व सर्व परिस्थितीत शाश्वत पाणीपुरवठा करणारी ही योजना असल्याने, गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती विठ्ठल पारडे यांनी दिली आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायतच्या सरपंच सौ. रेणुका भानुदास ताकतोडे ह्या होत्या, तर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सचिव रामेश्वर ठाकरे, उपसरपंच नारायण खडसे, ग्रामपंचायत सदस्या सौ अयोध्या गोपाल खडसे, सौ रूपाली जगदीश खडसे, सौ रेणुका सुधाकर खडसे, सौ ज्योती संजय तुरेराव, ग्राम पंचायत सदस्य श्री जगन दशरथ खडसे, श्री आकाश मुरलीधर खडसे, आदीसह बहुसंख्य गावकऱ्यांची उपस्थिती होती.
” राजकारण हे समाज सेवेच एक प्रभावी माध्यम असून, खूप मोठ्या व्यापक प्रमाणात समाज सेवा करण्याची संधी मिळते या स्तुत्य हेतूनेच, मी राजकारणात प्रवेश केला आहे. माझ्यावर विश्वास ठेवून भर जहागीर सर्कलमधील सर्व जनतेने मला समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे हे, मी कदापिही विसरणार नाही. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील अखेरच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी करत आहे आणि सदैव करतच राहणार..!
___ अमित पाटील खडसे ( जिल्हापरिषद सदस्य भर जहागीर सर्कल )
शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता करून ग्राम पंचायत मार्फत प्रस्ताव दाखल केला. आमच्या प्रस्तावाचा कर्तव्यदक्ष आमचे जिल्हापरिषद सदस्य अमित पाटील खडसे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे आमच्या कामाला गती मिळाली.
__ विठ्ठल उद्धव पारडे
( सरपंच प्रतिनिधी तथा ग्राम पंचायत सदस्य शेलुखडसे )