दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
दत्ताजी भाले स्मृती प्रतिष्ठान (मोठी लाठ )उस्माननगर, स्वामी विवेकानंद वसतीगृहाच्या भव्य इमारत बांधकामासाठी १४ लाख रुपयांचा निधी जाहीर करूण वसतिगृहचे बांधकाम पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हया चे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
आदर्श व्यक्तिमत्व त्यागर्ती श्यामसुंदराव जहागिरदार गुरुजी यांचा ८७ व्या वाढदिस मान्यवरांच्या उपस्थितीत दि. १मे रोजी व स्वामी विवेकानंद वसतीगृहाच्या भुमीपुजन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष पदावरुन खासदार चिखलीकर बोलतं होते. व्यासपीठावर श्री १०८ ष ब प्र.डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेशजी पवार, संघचालक डॉ.सुधिर कोकरे, रामदास पाटील सुमठाणकर,एकनाथ पवार, पुरुषोत्तराव देशपांडे,सौ.शालिनी जहागिरदार, आदी उपस्थित होते. गुरुजीनी केलेले काम मोठे आहे त्यागाचे आहे लाठी हा पुर्वीपासुन परिवाराचा गड आहे ते कायम ठेवण्याचे काम गुरुजी नी केले आहे. वसतिगृह बांधकामासाठी रामपाटील रातोळीकर व खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या निधितुन चौदा लाखांचा निधी चिखलीकर यांनी जहिर केला. सन १९७३ पासुन गरजु , अनाथ वंचित विद्यार्थ्या साठी शासनाची कोणतीही मदत न घेता मोजक्याच आश्रय दात्यांच्या सहकार्याने गुरुजी वसतीगृह चालवतात. हे वसतीगृह कायम गरुजुंनसाठी उपलब्ध असावे यासाठी इमारत बांधण्याचा संकल्प स्वयंसेवकांनी केला आहे. ते काम पुर्णत्वाकडे जात आहे.ग्रामीण भागातील स्वयंसेवक किती मोठे काम करुशकतो गुरुजींचे काम नंदादीप प्रमाणे आहे याचा आदर्श स्वयंसेक घेतात माझ्या झोळीतील पाच हजार रुपये बांधकामासाठी देत असल्याचे विरुपाक्ष महाराज यांनी सांगितले. या कार्यांसाठी दिलेली मदत कमीच असल्याचे सांगुण आमदार राजेशजी पवार यांनी बांधकामासाठी एकलाख अकराहजार रूपयाची मदत जाहीर केली. एकनाथ पवार यांनी एकावन्न हजार रुपयांची मदत जाहीर केली. आपले मनोगत व्यक्त करतांना गुरुजी म्हणाले जिल्ह्यात संघाचा स्वयंसेवक म्हणुन काम करत असतांना जेष्टसंघ प्रचारक दत्ताजी भाले यांची भेट झाली . सामाजिक गरजे प्रमाणे व भाले यांच्या सुचने नुसार गुरुजी नी वसतीगृह प्रारंभ केले. आजपर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेऊन जिवनात यशस्वी व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. मी घडलो ते संघामुळे मला जे मोठेपण मिळत ते संघामुळे . हे सर्वकाही करतांना पत्नी सौ.शालीनी जहागिरदार यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे मी हे सगळं करू शकलो असे भावनिक उद्गार गुरुजींनी सत्काराला उत्तर देताना काढले. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर , प्राचार्य अनंत पांडे,वारकड गुरुजी, एकनाथराव पवार , डॉ. सुधीर कोकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला आनंदराव पाटील लाठकर, नितिन पाटील लाटकर, आनंदराव पाटील शिंदे, गोविंद बोदेमवाड प्राचार्य, शंकरराव ढगे, शेकापूरे गुरूजी चंद्रकांत महाराज लाठकर,रूद्र ( संजय ) वारकड चेअरमन,प्रदीप देशमुख, व महाराष्ट्रातील संघपरिवारातील कार्यकर्ते, आजी – माजी विद्यार्थी व परिसरातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव सोनटक्के यांनी केले सूत्रसंचालन राजीव अंबेकर प्रवेक्षक यांनी केले तर आभार सूर्यकांत मालीपाटिल यांनी मानले.