दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
उपसंपादक
आष्टी(श)(वर्धा) : नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकित आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये१८पैकी १५ जागा जिंकत काँग्रेस पक्षाच्या गटाने मुसंडी मारली त्यात सर्वाधिक मताने अनुसूचित जाती प्रवर्गातील वनिताताई सोमकुंवर सर्वाधिक मते घेवून विजयी झाल्यात त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्षपदाची माळ काँग्रेस पक्ष वनिताताई सोमकुंवर यांच्या गळ्यात टाकतील असा आशावाद अनु.जाती वर्गात व्यक्त केल्या जात आहे त्या एकूण विजयी उमेदवाराच्या तुलनेत अधिक मताधिक्याने विजय झाल्या आहेत त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाच्या गटाने अध्यक्ष पद दिल्यास आर्वी विधानसभेतील अनु.जाती वर्गातील मते काँग्रेसकडे आकर्षित होण्यासाठी एक प्रभावी उपाय ठरू शकते शिवाय खुल्या प्रवर्गातील अध्यक्षपद राखीव वर्ग वगळता एका अनु.जाती,जमातीला गटातील प्रतिनिधीला बहाल करणे एक सम्यक न्याय ठरते अनुसूचित जाती,जमाती प्रवर्गातील उमेदवारांना वंचित,बसपा वगळता कोणताही राजकीय पक्ष गुणवत्तेचा विचार न करता खुल्या प्रवर्गातून संधी देत नाही यावरून राजकीय पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे हे वास्तव जागोजागी अनुभवयास मिळत आहे एवढं काय तर कंत्राटपद्धती मध्ये सरसगट एकाच समूहाच्या कंत्राटदाराला ९९ टक्के कंत्राटी कामे दिल्या जातात त्यामुळे आंतरधर्मीय आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली आहे म्हणजे आमदार,खासदारांचा शासकीय विकास निधी एकाच प्रवर्गाभोवती फिरत असल्याचे चित्र एक साधे संशोधन केल्यास निदर्शनास येते मग आम्ही काय?शिलाई मशीन, सायकल,कोंबड्या,बकऱ्या अशा समकक्ष योजनेसाठीच आम्ही पात्र आहोत काय?असा सूर सध्या जोर धरत आहे पण अनु.जाती अंतर्गत वैचारिक फितुरीमुळे मुख्य उद्देशाला खो बसत आहे हा भाग अलविदा आहे काँग्रेस पक्षाचे व्होट बँक अनुसूचित जाती वर्ग आहे मात्र काही प्रमाणात तो भाजपा पक्षाकडे वळता झाला आहे शिवाय आर्वी शहरात भाजपा आमदारांनी अनु.जाती वर्गाला आकर्षित करण्यासाठी १ कोटी रूपयाचा विकास निधी अनेक बुद्धविहारांना देऊन मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न चालवला आहे त्यावर उपाय म्हणून आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कारंजा (घा)अध्यक्षपदी अनु.जाती वर्गाच्या नेतृत्व करणाऱ्या वनिताताई सोमकुंवर यांना अध्यक्ष पदाची संधी देवून भाजप आमदाराच्या खेळीवर काँग्रेसच्या माजी आमदाराचा नहेले पे दहेला होईल असा एक राजकीय अंदाज लावल्या जात आहे मात्र यातून काँग्रेस पक्ष काय निर्णय घेते याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे