दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:यांत्रिकीकरणाने शेती सोपी झाली असली तरी अलीकडच्या काळात विविध यंत्राच्या किमती वाढल्या त्याला लागणारे डिझेल, पेट्रोलचे दर शेतकऱ्यांच्या अवाक्या बाहेर जात आहेत. कृषी निविष्ठा कीटकनाशकांच्या किमती मनमानीपणे वाढल्या जात आहेत. पाईप, मजुरीच्या दरात प्रचंड वाढ, वीज बिल यासह अन्य बाबींचा देखील वाढत्या मशागत खर्च वाढण्यास मोठा हातभार लागत आहे. यात सर्वात मोठी अडचण मजुरांची आहे. शोधूनही मजूर मिळत नाहीत. मिळाले तर मजुरी कमी वेळात व आवाच्या सव्वा दराने मजुरी चुकावी लागते. शेतमशागतीच्या खर्चात देसुमार वाढ झाली असून शेतमाल कवडीमोल विकावा लागतो. त्यामुळे शेतातील यांत्रिकीकरण वरदान ठरण्याऐवजी आता शाप ठरत आहे .शेती परवडत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस येत असून अनेक शेतकरी अन्य पयार्थी व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन-तीन दशकापासून शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाटत असून कमी वेळ व कमी मनुष्यबळात शेती होत आहे. पारंपरिक शेत मशागत पद्धत जवळपास कालबाह्यच झाली सुरुवातीला शेतीमधील यांत्रिकरण व शेतीव शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असले तरी आता यांत्रिकीकरण महाग झाल्याने शाप ठरत आहे. शेती मशागतीचा खर्च बेसुमार वाढला असला तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्म्यातही उत्पन्नच निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत . खर्च लाखात होत असेल तर उत्पन्न मात्र हजारात येते याला शेतमालाला असलेला कवडीमोल भाव कारणीभूत आहे. या अल्पभूधारकांची मोठी अडचण होत असून खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी त्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक मशागतिकडे मळावे यांत्रिकीकरणाची शेती इंधनाच्या बेफाम दरवाढीमुळे परवडणारे नाही असा सूर ऐकू येत आहे. इंधनावर सबसिडी हवी : शेतीच्या मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर धारकांना डिझेलच्या किमतीमध्ये सबसिडी द्यावी त्यामुळे शेती मशागतीच्या खचार्चा भार कमी होईल गेल्या वर्षी पेक्षा यंदा नागरणीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हंगाम जसजसा जवळ येईल त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.