दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
राज्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाच्या धुमकुळ घालतोय यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले त्याचबरोबर शीतपेय विक्री करणाऱ्याचे व्यवसायिकाची अडचणीत देखील वाढलेले आहेत पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे शीतपेय विक्रीत लक्षाणीय घट दिसून येत आहे जालना जिल्ह्यातील उसाचा रस विक्री करणारी व्यवसाय याला अपवाद नाहीत जालना बीड
महामार्गवरील ऊस चे रस विक्री करणाऱ्या असंख्य व्यवसायिकांना बदललेल्या वातावरणात फटका बसला आहे
आसमानी आणि सुलतानी संकटाशी शेतकरी अडचणीत असताना आता व्यवसायिक देखील संकटात सापडलेले आहेत मागील 10 ते 12 दिवसाने असलेले ढगाळ हवामान आणि पाऊस यामुळे छोटा व्यवसायिकांना फटका बसत आहे शीतपेय विक्रेते नारळ पाणी टरबूज खरबूज विक्रेते.ज्यूस सेंटर या ठिकाणी असलेली गर्दीच्या ठिकाण आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे याच बदलल्या वातावरणाचा सर्वाधिक फटका उसाचा रस विक्रेते करणारी रसवंती चालकांना बसत आहे यामुळे दोन हजार ते तीन रुपये होणारे विक्री आज 500 ते 600 रुपये येत आहे
मनागत व्यवसायाची एक उच्च शिक्षित तरुणाची मुलाखत घेतली तर त्यांना सांगितलं की आता उच्चशिक्षित ही व्यवसायाकडे वळत आहे
त्याचप्रमाणे मी ऊस रसवंती चालू केली मी संतोष शास्त्री
सांगतो की यावर्षी खर्च निघणे सुद्धा मुश्किल झाला आहे दुकान किराया भाडे लाईट बिल या सर्व बाबी बघून विचार जर केला तर हवामाना मुळे उपासमारीची वेळ आलेली आहे दरवर्षी चार महिन्याची पूर्ण हे व्यवसाय फुल चालतो पण त्याच हिशोबांना हा व्यवसाय चालू केला पण वातावरणामुळे माझ्यासारखे व्यवसायिक वर उपासमारीची वेळ आलेली आहे