दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती -श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- सध्या शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्या लागल्या आहेत आणि त्यातल्या त्यात लग्न सराई असल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस अपुऱ्या पडत असून प्रवाशांचे बेहाल होत आहेत.गोरगरिबांची लालपरी ही जीवघेणी ठरू नये याकडे एसटी महामंडळाने लक्ष द्यावे.एकतर तापमानात वाढ झाली असून त्यामध्ये बसेस गच्च भरून जातं असताना दिसत आहे.यंदाही नियोजन एसटी महामंडळाचे नियोजन शून्य असल्यामुळे महामंडळाच्या बसेस वर ताण वाढलेला आहे तसेच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.सरकारने लागू केलेल्या सवलतीमुळे महीला व वयोवृद्ध प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढलेली असून एसटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा त्यामुळे मानसिक त्रास वाढला आहे.एसटी बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या अपंग,वयोवृद्ध तसेच हार्ट पेशंट,दमा,मिरगी अश्या मोठ्या आजाराच्या पेशंटला या कडकडत्या उन्हात बस प्रवासात जीव जाण्याची पाळी आली आहे.त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रवासी सेवांचा दर्जा उंचावण्याऐवजी ढासळताना दिसत आहे.चालक-वाहकांच्या बरोबरच अधिकाऱ्यांनी देखील प्रवाशांच्या समस्या जाणून त्याचे तातडीने निराकरण करणे महत्वाचे आहे.
सध्या परिस्थितीत ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असं ब्रीदवाक्य असलेलं एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आणि उपक्रम राबविण्यात निरर्थक ठरत आहे.त्यामुळे आता प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निराकरण करणे हे आगारप्रमुख,विभागप्रमुखांचे उत्तरदायित्व असून एसटी महामंडळाच्या नियोजन बद्ध परीक्षेत विभागप्रमुख कितपत खरे उतरणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
—————————————-
सरकारने महिला व वयोवृद्ध यांना फ्री बस प्रवास सुरू केला तेव्हापासून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ आहे.परंतु जुनाट भंगार बसेस अनेक वेळा रस्त्यात बंद पडून प्रवाशांचे हाल झाल्याचेही पहावयास मिळतात त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विभाग नियंत्रक यांनी नवीन जादा बसेस चालू कराव्या.
– विदर्भकुमार बोबडे,प्रदेश प्रतिनिधी,काँग्रेस
—————————————-
—————————————-
बहुतांश लांब पल्ल्याच्या बस गाड्यांची अवस्था चांगली असली तरी ग्रामीण भागात धावणाऱ्या बचगाड्यातून मात्र प्रवाशांना अगदी न्यायला जास्त प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे प्रवाशांकडून चांगले उत्पन्न मिळत असतानाही चांगल्या बस गाड्यांमधून सेवा देण्यात मात्र एसटी महामंडळ कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
– मनीष मेन,युवा जिल्हाध्यक्ष भाजयुमो अमरावती ग्रामीण
—————————————-
—————————————
एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत असताना प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये प्रवास करीत आहेत करिता महामंडळाने जादा बसेसची सेवा प्रवाश्यांना उपलब्ध करून द्यावी.आमच्या अंजनगाव सुर्जी बस स्थानकाचे दुर्दैव तसेच दुरवस्थाच आहे.कित्येक वर्षापासून अंजनगाव सुर्जी आगराचा प्रश्न प्रलंबित असून लोकप्रतिनिधी सह महामंडळाने प्रवाशांची दखल घेऊन हा प्रश्न निकाली काढावा.
– प्रवीण पटूकले,शहर उपाध्यक्ष,भाजपा,अंजनगाव सुर्जी