दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
लातुर/अहमदपुर:अहमदपुर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी साठा असताना सुद्धा नगरपालिकेच्या गलतान नियोजनामुळे नळाला 30 ते 35 दिवसाला पाणी येत आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.सध्या कडाक्याचा उन्हाळा असून नळाला पाणी येत नसल्यामुळे चढ्याभावाने टँकरचे विकतचे पाणी घेऊन अहमदपुरकराना आपली तहान भागवावी लागत आहे.वर्षभरात केवळ 8 ते 10वेळा पाणी देऊन भरमसाठ पाणीपट्टी वसुली केली जात आहे शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल 44 कोटी रुपये खर्च करून ही आणी पाणी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही नगरपालिकेच्या नियोजनाअभावी नागरिकांचे हाल होत आहेत .मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसुली केली जाते पाणी नाही तर पाणी पट्टी पण घेऊ नये आणी येत्या आठ दिवसात जर प्रशासनाने पाणी प्रश्नावर तोडगा काढावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे आमची माती आमची माणस ग्रुपच्या वतीने मुख्यधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.त्या प्रसंगी चंद्रशेखर भालेराव,दयानंद पाटील,प्रकाश बुलबुले,प्रा.डॉ. सय्यद अकबर सर,अनिकेत फुलारी,गोविंद काडवदे,सुनील स्वामी,बालाजी पारेकर,रवी मद्रेवार,आणी ग्रुपचे इतर सदस्य उप.