दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:हाणेगाव, मरखेल, करडखेड, खानापूर, शहापूर, माळेगाव, मानूर या सर्कलमधील शेकडो शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधूननाराजी व्यक्त होत आहे.केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्याहितासाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली परंतु शेतकरी या योजनेपासून अजूनही वंचित आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळत नाही असंख्य लाभार्थी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तालुक्यातील पीएम किसान योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने पुढाकार घेऊन ही समस्या सोडवून शेतकऱ्यांच्या तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र याकडे फारसे कोणीही लक्षदेत नसल्याने शेतकऱ्यातून नाराजीचा सूर आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत देगलूर तालुक्यातील असंख्य खेडापाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा सन्मान निधी अजूनही मिळत नाही. परंतु तालुक्यात काही शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला परंतू दुसरा हप्ता मिळाला नसल्यानेशेतकरी तहसील कार्यालया चकरा मारून हैराण होत आहेत.या योजनेच्या हप्त्यापासून ते अजूनही वंचित आहेत अशा शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकारण करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून या आवश्यक किती कागदपत्रे व डाटा दुरुस्तीसाठी मुख्य समस्या दूर करावी. शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासनाकडून एका सार्वजनिक ठिकाणी शिबिर घेऊन शिबिरात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत, हे सांगुन ही समस्या सोडविण्यासाठी देगलूर कृषी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पुढाकार अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.