दैनिक चालु वार्ता उमापूर प्रतिनिधी-कृष्णा जाधव
गेवराई/उमापूर उमापूर मधील पाणी प्रश्न गेल्या 20, 25ं वर्षापासून जसेच तसे उमापूरकरांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. उमापूर साठी स्वतंत्र फिल्टर असूनही, नवीन पाईपलाईन असूनही, यात पाणी नाही.सर्कलचे एवढे मोठे गाव असूनही येथे पिण्यासाठी पाणी नाही.दररोज येथे टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते.दरवर्षी या गावात पाण्यासाठी बोंबाबोंब होत राहते.पिण्यासाठी पाणी नसल्याने ग्रामस्थ वैतागले आहे.ग्रामपंचायत उमापूर पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध करून देऊ शकत नाही.त्यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहे.सांगता कोणाला या गावचा वाली कोणी नाही का?
उमापूर चे ग्रामसेवक फक्त अमावस्या व पौर्णिमेलाच दिसतात.यांना उमापूर ची गरजच नाही असे दिसून येते.हे अचानक लायटि सारखे गुल होतात.
यांना या गावाची काहीही गरजनसल्या सारखे हे वागतात.आणि हे सत्तेवर बसलेली मंडळी तर……?
मतदान जवळ आल्यावरच यांना गावाची आठवण येते या गावाला एक दोन दिवस पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते.मग कायमस्वरूपी सारखे तेच हाल या गावाचे होते.कोणीही निवडून आले तरी या गावाचे पाण्या बिगर हेच हाल राहणार का?असा प्रश्न ग्रामस्थातून उपस्थित होतो आहे.येथील राजकारण पुढारी फक्त लुटण्यासाठीच आहे का?कधी गावाचा पाणी प्रश्न सुटेल का?
कित्येक वर्षापासून या गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. एकमहिन्यात एक दोन वेळेस पाणी नळाला सोडून नळपट्टी वसूल केली जाते.ग्रामपंचायत मध्ये हा काय बाजार चालला आहे.याकडे कोणाचेही लक्ष का लागत नाही!
गावाला सरपंच ग्रामसेवक आहे का?असा प्रश्न नागरिकांतून होत आहे.
जेमतेम उमापूरचा विकास असून.याकडे कोणाचेही लक्ष लागत नाही का?गावाला ग्रामसेवक आहे की नाही हेच 50% गावकऱ्यांना माहीतच नाही!”शासन आपल्या दारी” हे फक्त नावापुरतेच आहे का?
उमापूर मध्ये नावापुरतेच विकासाचे काम झाले आहे.तांडा वस्तीचे रस्ते ही तसेच आहे.खड्डे आणखी जशास तसेच आहे.या गावाला पाणी तर नाहीच पण रस्तेही खराबच आहे.कायम अशा परिस्थितीत नागरिकांना ही गैरसोय सहन करावी लागते.ही मंडळी गप्प का आहे. रस्त्या नाल्याचे पाण्याचे बजेट जाते कुठे?
हे विचारणारे अधिकारी कोणीच नाही का?एवढा खर्च करून मग उमापूर पाण्याविना का?गेले कित्येक वर्षापासून पाणीच मिळेना पिण्यासाठी.महिन्याला एक दोन वेळेस पाणी सोडून जबरीने नळपट्टी वसूल केली जाते.अशी उमापूर मधील नागरिकांतून तळमळ व्यक्त होते.विकतचे पाणी उमापूरकरांनाकाही परवडत नाही.
300लिटर पाण्याचीकिंमत 100रुपये मोजावेलागतात.
दररोज याच दराप्रमाणे पाणी पिण्यासाठी घ्यावे लागते.पाण्यासाठी उमापूर बेजार असून.ग्रामपंचायत ने पाण्याची सोय लवकरात लवकर करून द्यावी.हे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.