दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे
मंठा तालुक्यातील
पूर्णा नदीवरील एकाही रेती घाटाचे लिलाव झाले नसतांना भुवन,शिरपूर,कानडी,वाघाळा, लिंबखेडा, दूधा,टाकळखोपा, इंचा.या वाळू घाटाच्या परिसरातून अवैध्य वाळू उपसा जोरात चालू असल्याचे प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी २९ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यास निवेदन देऊन तक्रार करण्यात आली निवेदनात म्हटले आहे कि तालुका मंठा येथील पुर्णा नदीच्या पात्रातून वाळूची चोरी होत असताना तसीलदार मंठा यांनी मोठी कारवाई करून काही वाहने पकडली होती काही वाळू तस्करी करणाऱ्या लोकांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती,याचाच फायदा घेऊन मास्टर माईंड मंडळाधिकारी श्री.बेले संबंधित व तलाठी यांनी वाळू तस्करांसोबत तडजोड करून चोरीच्या मार्गाने वाळू तस्करी चालू आहे, कारण तस्करांवर मोठी कारवाई झाल्यानंतर वाळू तस्कर हतबल झाले होते, हि गोष्ट संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नियोजित कट रचून वाळू कशी विक्री करायची कशा पद्धतीने गोपनीयता पाळायचे या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर सरस वाळू विक्री चालू आहे, पूर्णा नदी पात्राच्या पात्रातून भवन.शिरपूर.कानडी. वाघाळा.लिंमखेडा.दूधा.टाकळ खोपा. इंचा.उत्सवद देवठाणा, या ग्रामपंचायती बरखास्त करून या वाळू घाटाच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी करून विक्री केली जाते, तसेच या पूर्णा नदी पात्रातून हिंगोली बुलढाणा जिल्ह्यात वाळू विक्री होत आहे, भाऊसाहेब घुगे मंडळ अधिकारी रजेवर असल्यामुळे श्री बेले यांच्या कडे चार्ज आहे, श्री.नितीन चिंचोले तलाठी, तसेच पोलिसांना या गोष्टीची सगळी कल्पना आहे परंतु पोलीस कारवाई करून महसूल विभागाला का कळवत नाही, तळणी पोलीस चौकीत बीट जमादार श्री.कातकडे, श्री.मुंढे,श्री.बोरडे, हे कर्मचारी तळणी चौकीला असून सुद्धा कारवाई करीत नाहीत, याचा अर्थ आर्थिक व्यवहारात गुंतलेत का? कारण महाराष्ट्र शासनाने वाळू विक्री टेंडर प्रक्रिया चालू असणारी टेंडर रद्द करून वाळू विक्री केव्हापासून रद्द झालेली आहे, कारण याचा गैरफायदा घेत वाळु तस्कर कर्मचाऱ्यांना जमवता चोरून वाळू विक्री करू लागले, परंतु मंठा तहसीलदार यांनी मागच्या आठवड्यात मोठी कारवाई केल्यानंतर त्या भागात वाळू तस्कराविरुद्ध मोठी कारवाई झाल्यामुळे महसूल विभागाची दहशत निर्माण झाली होती, याचाच गैरफायदा घेत या वाळू पट्ट्यातील मंडळ अधिकारी श्री.बेले,तलाठी श्री.साळवे तसेच संबंधित मंडळ अधिकारी तलाठी यांना हप्ते देऊन वाळू चोरीच्या मार्गाने चालू आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी चोरीची वाळू नेण्यासाठी रस्ता दिला त्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, कारण पूर्णा पात्रातून वाळू चोरीची वाहन असो अथवा नसो, जिल्हाधिकारी जालना कार्यालयामार्फत विशेष पथक म्हणून त्या पात्राची पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतातील रस्त्याची पाहणी करून ज्या शेतकऱ्यांनी वाळू चोरीसाठी सहकार्य केले त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई केली पाहिजे तरच हा प्रकार बंद होऊ शकतो, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अपेक्षा आहे संबंधित मंडळ अधिकारी संबंधित शेतकरी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कारण संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतातून वाळू चोरीसाठी रस्ता दिला ही संपूर्ण माहिती आहे म्हणून कारवाई झालीच पाहिजे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल…