दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना:राज्यामध्ये नुकता झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये काही गैरप्रकार समोर आले असून याची चौकशी होणार आहे यामुळे भरती प्रक्रियामध्ये निवड झालेल्या उमेदवारामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे जालना जिल्ह्यातील निवड झालेल्या काही पोलीस मित्रांनी माजी राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुन रावजी खोतकर यांची त्यांच्या भाग्यनगर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व याबाबत आमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी गेल्या तीन वर्षापासून म्हणजे कोविड कार्य काळापासून आम्ही भरतीसाठी प्रयत्न करत आहोत अभ्यास केला असून सराव देखील मोठ्या प्रमाणावर केलेला आहे आता आमची निवड देखील झालेली आहे. परंतु भरती प्रक्रिया मध्ये गैरप्रकारामुळे निवड प्रक्रिया रद्द होईल की काय अशा स्वरूपाची भीती आमच्या मनामध्ये व आमच्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये निर्माण झालेले आहे यामध्ये आपण व्यक्तीच्या लक्ष घालावे व आमच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती या पोलीस मित्रांनी अर्जुन राव खोतकर यांच्याकडे केली यावेळी अर्जुनराव खोतकर यांनी तात्काळ राज्याचे पोलीस प्रमुख यांच्याशी व गृह विभागाचे सचिव यांच्याशी संपर्क करून ही बाब त्यांच्या कानावर घातली व निवड झालेल्या उमेदवारांना होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली यावेळी संबंधितांनी सांगितले की निवड प्रक्रिया रद्द होणार नसून निवड झालेल्या कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही मात्र गैरप्रकारची सखोल चौकशी कशी केली जाईल असे सांगितले यामुळे या उमेदवारांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे या पोलीस मित्रामध्ये यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यामध्ये आनंदमय वातावरण दिसून आले यावेळी त्यांनी कोतकर साहेबांचे आभार व्यक्त केले या भरती प्रक्रियेमध्ये त्यांची निवड झाल्यामुळे अर्जुन खोतकर यांनी त्यांचे स्वागत केले