दैनिक चालु वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी- बीड/अंबाजोगाई-
दिनांक १/०६/२०२३ रोजी अंबाजोगाई तालुका लोखंडी सावरगाव येथे सौ. दीपाताई मुधोळ (मुंडे) मॅडम जिल्हाधिकारी बीड या ज्ञानदीप अकॅडमी च्या वर्धापन दिन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार करून मार्गदर्शन करताना अकॅडमी संचालक श्री दत्ता भगवान दराडे यांच्या अथक परिश्रमामुळे १६ विद्यार्थीनीं मुली व ०८ विद्यार्थी मुलं हे पोलिस व सैन्य भरतीत यशस्वी झाले आहेत प्रथम त्यांचे आपण सर्वांनी अभिनंदन केले पाहिजे, दराडे कुटुंबीयांचे कौतुक केले की सर्व जे विद्यार्थी आज यशस्वी झालेले आहेत ते गोरगरीब, शेतकरी, अल्पभूधारक यांचे मुल, मुली असताना सुद्धा त्यांच्याकडून व्यवस्थित सर्व तयारी करून त्यांना तुम्ही घडवलं याबद्दल संचालक श्री दत्ता दराडे व त्यांच्या पत्नी सुनिता वहीनी त्यांचे विशेष कौतुक केले.
विशेष म्हणजे मुल व मुली या आपल्या निवासात असतात व त्याबद्दल त्यांचे पालक हे निश्चिंत असतात ही खरी तुम्ही विश्वासाहर्ता कमावलेली आहे व त्या विद्यार्थ्यांना यशस्वी करून तुम्ही तुमची कर्तव्यनिष्ठता दाखवली आहे , विद्यार्थी ,विद्यार्थिनींना व आलेल्या सर्व पालकांना जिल्हाधिकारी मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नितीनजी चाटे सर
‘स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सर्जरी विभाग प्रमुख’ होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात
श्री दराडे यांनी आपले पोलीस भरती व सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण एवढेच न ठेवता आपल्या प्रशिक्षण केंद्रातून आयएएस ,आयपीएस मोठे अधिकारी सुद्धा तयार झाले पाहिजे व ते तुम्ही निश्चितच करू शकतात अशी आशा व्यक्त केली व विद्यार्थ्यांनी कोणत्याही वाम मार्गात न जाता आपले आई-वडील किती कष्ट करतात याची जाण ठेवून अभ्यास करा व यशस्वी व्हा हाच मंत्र तुमच्या आयुष्याचा यशस्वी मंत्र होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. तसेच प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार श्री रामभाऊ कुलकर्णी यांचे पण मोलाचे मार्गदर्शन झाले व त्यांनी मार्गदर्शन करताना हालाखीच्या परिस्थितीत ही कशी जिद्दीने मात करता येते हे आपल्या भाषणात सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांची ओळख,व थोडक्यात त्यांचा जीवनपट अतिशय सुंदर आपल्या भाषा शैलीत दैनिक वार्ताचे संपादक श्री परमेश्वरजी गीत्ते यांनी मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दत्ता दराडे यांनी केले प्रास्ताविकात श्री दराडे सर यांनी हे यश माझ्या एकट्याचे नसून माझ्या संपूर्ण टीमचे या प्रशिक्षण केंद्रामधील श्रीकांत गीते सर ,सुरेश बारी सर, भराडे सर,शिदे सर, चव्हाण सर यांची सर्वांच्या मेहनतीमुळे सर्वांनी – यश संपादन केले. तर सुत्रसंचालन व आभार गोविंद महाराज केंद्रे यांनी मानले. यावेळी जिल्हाधिकारी सौ. दिपाताई मुधोळ मुंडे व मान्यवरांच्या हस्ते अॅकॅडमीचा १५ वा वर्धापनदिन व अॅकॅडमीचे २४ विद्यार्थी हे पोलिस भरतीत आणि सैन्य भरतीत यशस्वी झाल्याने त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, शालेय विद्यार्थी, अॅकॅडमीचे विद्यार्थी, आप्तेष्ट, नातेवाईक, सहकारी, स्नेहीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांनी वाम मार्गाला न जाता आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा.
:- नितीनजी चाटे सर
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सर्जरी विभाग प्रमुख