दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी-ज्ञानेश्वर साळुंके
. पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे यंदा वारीसाठी आधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनांला दिले आहेत. तसेच वारीसाठी येणाऱ्या परतीच्या वाहनांना प्रवासासह टोल माफ करण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात यावी असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे नगरपालिकेसाठी दहा कोटींची तर ग्रामपंचायतीसाठी पंचवीस वरुन पन्नास लाख रुपयांची अशी दुप्पट तरतूद केली आहे. तर रस्त्यासाठी वेगळा निधी दिला गेला आहे. त्यामुळे रस्त्याची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्यांचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वारी मार्गावरील पुणे,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी दुप्पट केला आहे हा निधी तात्काळ वितरीत करण्यांच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. पंढरीच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने तयारीचा आढावा बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिंतीत सह्याद्री राज्य अतिथी सभागृहांत ही बैठक पार पडली. या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह पुणे महसूल विभागातील अधिकारी व पुणे सातारा सांगली या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आदीं विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.