दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
प्रलंबित खरीप हंगाम पूर्व कामांची पूर्तता लवकर करा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनांच्या लाभासाठी अर्ज दाखल केलेल्या अर्जना लवकर मंजुरी देण्यात यावी.सिंचन विहीर योजेने अंतर्गत निर्माण झालेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करुन लाभार्थ्यांना जलद गतीने लाभ देऊन निधी वितरित करण्यात यावा,अशा सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्याचे तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या.यावेळी आमदार उदयसिंह राजपूत,तालुका प्रमुख संजय मोटे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवगर्जना “आता जिंकेपर्यंत लढायचं” या संपर्क मोहिमेदरम्यान आज ता.१० जुन रोजी त्यांनी उदयसिंह राजपूत यांच्यासोबत कन्नड तालुक्याचा दौरा केला.यामध्ये त्यांनी नाचनवेल, सेलगांव,वाकी व पिशोर येथिल शेतकरी व स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या.सिंचन विहिरींचे अनुदान मिळण्यासाठी मागिल दोन-तीन वर्षांपासून आम्ही अर्ज केलेले आहेत काहींचे तर पंचनामे व स्थळ पाहणी सुद्धा झालेली आहेत. परंतु प्रशासकीय पातळीवर अजूनही हे अर्ज प्रलंबित असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.या तक्रारदारांच्या अर्जातील तांत्रिक चुका तात्काळ दुरुस्त करून लाभार्थ्यांना लवकर लाभ देण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी दाखल केलेल्या फायलींचा गहाळ होण्याचा प्रश्न सुध्दा यावेळी उपस्थित झाला. त्यावरही सूचना देत,फायली गहाळ कोणत्या कारणास्तव होतात,याची माहिती घ्यावी आणि यामध्ये दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
याप्रसंगी मा.आ.श्री.उदयसिंह राजपूत,तहसीलदार विद्याधर कडवकर,तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक,उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे,तालुकाप्रमुख संजय मोटे,तालुका संघटक रुपालीताई मोहिते,उप तालुकाप्रमुख विठ्ठल मनगटे, विभाग प्रमुख विश्वास मनगटे, संजय पिंपळे,विठ्ठल मनगटे, संजय मनगटे अनिल चव्हाण, उपविभाग प्रमुख विजय घोले,बापूराव सोनवणे, शाखाप्रमुख रामदास गुंजाळ, ज्ञानेश्वर वाडेकर,संतोष पारखे, दयानंद गायकवाड,विलास निकम व सुरेश घुले उपस्थित होते.