दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : भंडाराज गावात एकाच दिवशी दोन आत्महत्या झाल्याने तालुक्यात व गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर माहिती अशी की,काल दि.९ जुन रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान मृतक राधा विजय बोटोय वय वर्ष १७ राहणार भंडारज ह्या मुलीने तिच्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती मृतक हिच्या चुलत भावाने पोलीसांना दिली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे दाखल केले.त्या अल्पवयीन मुलीच्या प्रेताग्नी राख थंडी होत नाहीतर दि.१० जुन रोजीच्या रात्री २:३० वाजताच्या दरम्यान भंडारज गावातीलच मजूर गोपाल रामकृष्ण शिंगणे वय वर्ष ४० या इसमाने त्याच्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.घटनेची माहिती पोलीसांना मृतक गोपाल याचा भाऊ अनंत रामकृष्ण शिंगणे यांनी दिली असता पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला मृतकाला शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले.मृतक गोपाल रामकृष्ण शिंगणे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून मृतकाच्या पश्चात पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असल्याचे समजते.परंतु;मृतक राधा विजय बोटोय हिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप ही समजले नसल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे.या दोन्ही आत्महत्येच्या घटनेने गावासहित तालुक्यातील परिसरात हळहळ व शोक व्यक्त केला जात आहे आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अंजनगाव सुर्जी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुलभा राऊत,पोहेकॉ.संजय इंगळे,पोकॉ बजरंग इंगळे हे करीत आहेत.