दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- खरीप पिकाच्या पेरणीसाठी आवश्यक असणारी शेतीची मशागत जवळपास शेतकऱ्यांनी कडक उन्हाची परवा न करता पूर्ण केली आहे. खरीप पेरणीसाठी शेतकरी राजा सज्ज झाला असून त्याचे डोळे पाऊस केव्हा पडणार म्हणून आभाळाकडे लागले आहे.
लग्नसराई करीत शेतकरी राजा अतिशय कडक ऊन असताना देखील अंगाची लाही लाही होत असतांनाही आळस आळस नकरता उन्हाची तमा न बाळगता शेतीच्या कामाला लागला होता.
एप्रिल व मे महिना अतिशय भयानक ऊन कडक असताना ही शेतकरी राजा ऊन्हामध्ये शेतीत राबत राहीलाय या वर्षी लग्नसराईची धाम धूम बऱ्यापैकी होती. लग्नसराई उरकत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने या कडक उन्हात शेतातील नांगरणे ,वखरणे , केरकचरा , शेतीतील धसकटे , बाजूला काढून व धुरे साफ करून , शेती पेरणी साठी चांगल्या प्रकारे करून ठेवलेआहे. व शेतामध्ये
शेणखत टाकणे, खरीप पिकासाठी लागणारी शेतीच्या सर्व मशागतीचे कामे शेतकऱ्याने जवळपास पूर्ण केली असून , यावर्षी तरी वेळेवर पाऊस पडावा या आशेवर बळीराजा आहे.
गतवर्षी पाऊस वेळेवर आणि नियमित पडला नसल्याने , खरीप पिकाची वाढ कमी होऊन अनेक पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली होती. दरवर्षी भविष्याची स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी कर्जबाजारी होणारा शेतकरी केव्हा कर्जमुक्त होईल ? हे देव च जाणे. तरीही हिंमत न हरता यावर्षी शेतकरी लग्नसराई उसनेवारी करून वेळेवर पाऊस व्हावा म्हणून खरीप पेरणीसाठी पुन्हा एकदा कर्जबाजारी होऊन शेतात पेरणी करण्यासाठी गावातील सावकाराकडून किंवा कृषी दुकानातून बि बियाणे ,रसायनिक खते, कापूस , सोयाबीन घेण्यासाठी बाजारात विचारपूस करीत आहेत. गतवर्षी खरिपाच्या शेवटच्या टप्प्यात वरूणराजाने अचानक मुसळधार ,व अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ऐन सोयाबीन पिकाच्या मोसमात पावसाने माघार घेतल्याने उत्पन्नात घट झाली आहे. एप्रिल पर्यंत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पाठ सोडली नव्हती. अवघ्या काही दिवसांत ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीचे पेरणीपूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून घेतले.
यंदा कोणते पीक शेतात घ्यावे हे मात्र तो निश्चित विचार विनिमय करीत आहे.पण यंदा नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व कापूस याकडे लक्ष आहे काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे गतवर्षाचे कापसाचे चुका रे मिळण्यास विलंब लागत असल्याने शेतकरी आगेदरच संकटात सापडला आहे. खरीप पिकासाठी पेरणीपूर्वक जमिनीची मशागत पूर्ण करून शेतकरी राजा मृगाच्या पावसाचे आतुरतेने वाट पाहत आहे जर मृगनक्षत्रात मोठा आणि चांगला पेरणीयुक्त पाऊस झाला तर प्रथमच खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी तयार झाला आहे. फक्त पाऊस केव्हा पडतो . यावर शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची पेरणी अवलंबून आहे . शेतातील खरीप पिकासाठी जमिनीची पूर्ण मशागत झाली असून , पावसासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत आहे..
हाळद लागवड लगवड करण्यात शेतकरी व्यस्त
उस्माननगर व उस्माननगर परिसरात शेतकरी राजा हळद लावण्यासाठी नांगरटीच्या सह्याने व मजुराच्या साह्याने लागवड करण्यात व्यस्त आहे.
” पावसाळ्यापूर्वी नाली स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी. ”
उस्माननगर येथील पाचही वार्डातील नाली स्वच्छतेकडे पावसाळ्यापूर्वी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
उस्माननगर येथील मुख्य रस्त्यावर असणारी नाली ही केरकचरा व गाळाने जागोजागी भरलेली आहे. त्यामुळे दुर्गंधी व डासांची उत्पत्ती झाली आहे. यामुळे लहान मुलांबरोबर वडीलधाऱ्या व्यक्तींना विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे.
आठवडी बाजार व दररोज भरणाऱ्या बाजाराचा लिलाव ग्रामपंचायत कार्यालय मध्ये करण्यात आला. हा लिलाव हजारो रूपयाच्या वर लिलाव झाल्याची नागरिकात चर्चा आहे. या पैशातून नालीची स्वच्छता केल्यास योग्य होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
आगामी पावसाळ्यामध्ये पडलेल्या पावसाचे पाणी हे सरळ वाहून जाण्यास मदत होईल व दुर्गंधी होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतीने घ्यावी अशी मागणी नागरिकांत होत आहे.