दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भूम::- सालाबादप्रमाणे यावर्षी ही परमहंस स्वामी श्री निखिलेश्वरानंद पालखी यात्रा चे भूम ते हैद्राबाद चे प्रस्थान दि 15 जून गुरुवार रोजी होणार आहे.भूम येथील निखिल चेतना केंद्र च्या वतीने या पालखी यात्रे चे आयोजन करण्यात येत असते.भारतामधील प्राचीन ऋषी परंपरा ,आदर्श गुरू शिष्य परंपरा याचा प्रचार प्रसार व्हवा या उद्देशाने निखिल चेतना केंद्र हैदराबाद हे अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत. निखिल चेतना केंद्र चे मुख्य सद्गुरुदेव श्री अनिल कुमार जोशीजी यांच्या मार्गदर्शना खाली निखिल चेतना केंद्र भूम हे कार्य करीत आहेत.मागील 16 वर्षा पासून भुम ते हैदराबाद पायी पालखी यात्रा 450 किमी चा प्रवास करून हैदराबाद येथे गुरुपौर्णिमा च्या पावन पर्वा वर पोहचते.भारतातील प्राचीन विद्या ,प्राचीन ज्ञान, गुरुकुल परंपरा ,सनातन हिंदू धर्म याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने निखिल चेतना केंद्र कार्य करीत आहे. या यात्रेसाठी बाळासाहेब वाघमारे, रोहन जाधव, अविनाश बाराते,संजय सुर्वे,सुनील दाभाडे,मुकुंद वाघमारे, महेश पाचंगे,गजानन बाराते,अनिल माळी, प्रेमानंद महाजन,मयूर चांडगे,राजू उपरे,राहुल काटकर,सचिन थिटे,सागर शिंदे,सुरज शिंदे,संजय काकडे इत्यादि साधक परिश्रम घेत आहेत.