दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
बीड:-रीती-रिवाज, परंपरा ला कलाटणी देऊन मुलगी पाहताच दोन तासात शुभ मंगल संपन्न ही घटना माजलगाव जिल्हा बीड येथे काल दी 27 जुलै रोजी घडली आल्याने दोन्ही कुटुंबाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.चाऊस ( पाटोदा)आणि अलसारी(माजलगाव ) कुटुंबातील सदस्य तथा नवदाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्यक खर्चाला फाटा देत चट मंगनी पट ब्याह’ करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे.
पाटोदा येथील हसनभाई बिनकुर्दस ( चाऊस) यांचे सुपुत्र महमद चाऊस हे उच्चशिक्षित असून, त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे. यांच्यासाठी मुलगी पाहायला अलसारी परिवाराच्या निमंत्रणावरून गुरूवार (दि. २७) माजलगाव ला गेले होते. सलिम अलसारी यांची मुलगी ही सुद्धा उच्च शिक्षीत असून, दोघांनीही नवदाम्पत्य एकमेकांना पसंत केले. दोन्ही परिवाराचीही पसंती झाली आणि त्यातूनच अवाजवी खर्च आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे ? असा प्रस्ताव समोर आला. दोन्ही परिवारांनी त्याला होकार दिला आणि अवघ्या दोन तासांतच कौटुंबिक वातावरणात मोजक्या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थितीत मुस्लिम धर्म पद्धतीने विवाहबद्ध झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. नगराध्यक्ष सहाल चाऊस, मा. महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांची होती यावेळी बोलतांना सहाल चाऊस म्हणाले की दोन्ही परिवारांनी वेळ, श्रम व पैशांची बचत करून समस्त मुस्लिम समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे व समाजाला आता अशा प्रकारच्या विवाहांची गरज असून, चाऊस- अलसारी परिवाराचे अभिनंदन व कौतुक केले. या आदर्श विवाहासाठी प्रतिष्ठित व्यापारी कैफ मकराणी, ताहेर चाऊस, तौसिफ (जनता) मंहमद चाऊस भूम, सलीम साहारी, समद चाऊस व यांचा मित्रपरिवार आदी उपस्थित होते.