दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे.यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल यावर लक्ष केंद्रित करत अशासकीय व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.त्या अनुषंगने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून त्या अंतर्गत भूम येथील पारधी वस्ती या ठिकाणी एक हात मदतीचा हा उपक्रम तहसील कार्यालय भूम यांच्यावतीने आयोजित करण्यात आला. त्यामध्ये शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यात आले.आधार कार्ड नसलेल्या नागरिकांची आधार नोंदणी, शिधापत्रिका नसणाऱ्या कुटुंबांना त्या ठिकाणी शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. संजय गांधी, इंदिरा गांधी ,श्रावण बाळ या अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला.मतदान कार्ड नसणाऱ्या नागरिकांची मतदार नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी मा. शिवाजी शिंदे,उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, भूम तहसिल कर्यालयाचे तहसीलदार सचिन खाडे, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, प्रभारी नायब तहसीलदार संजय स्वामी,प्रभारी नायब तहसीलदार हरिश्चंद्र पवार,तलाठी प्रकाश पाटील,केदार एन.के व महसूल कर्मचारी उपस्थित होते.या उपक्रमातून वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ वितरित करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.