गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – जुन महिन्यात पुरेसा पाऊस पडला , पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुरेश्याच पाण्यावर पेरण्या केल्या त्यामध्ये कपाशी पिकाची लागवड करण्यात आली. नंतर काही दिवस पाऊसच पडला नाही तर शेतामध्ये लावण्यात आलेल्या कपाशी पिकांमध्ये लक्षणीय तुट / चुका आढळुन आल्या शेतकऱ्यांनी त्या तुट भरून कढल्या मागील आठ – दहा दिवसांपूर्वी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्या पावसामुळे कपाशी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत असुन अनेक ठिकाणी कापुस पिवळा पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असणारे कृषी सहायक नेमकं करतात काय ? त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना कृषी सल्ले द्यायला हवे असा सवाल शेतकरी वर्गातुन होत आहे.
यावर्षी वरूणराजा उशीरला बरसल्याने पेरण्या तर अनेक ठिकाणी खोळंबळ्या तर अनेक ठिकाणी पेरण्या शेतकऱ्यांनी कमी पावसावर केल्या. लोहा तालुक्यात आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे कपशी पिके पिवळी पडली असुन शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. जमीनिची मशागत , बि बियाणे , औषधे किटकनाशके , खते , मजुरीसह अन्य खर्च शेतकऱ्यांना करावा लागत असुन त्यामध्ये शेतातील पिंकावर आलेला रोगांचा प्रादुर्भाव व सध्या राज्यातील सत्तासंघर्षांचे चित्र पाहता शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत असुन शेतकऱ्यांचा वाली कोण हा सवाल जनसामान्यच्या तोंडातुन ऐकावयास मिळत आहे .