शेतकरी संघटनेच्यावतीने परंड्यामध्ये स्वागत करण्यात आले.
दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा- शासनाने शेतकऱ्यांच्या मालाला किमान वेतन कायद्या प्रमाणे किमान हमी भाव कायदा केला तरच चांगला भाव मिळणार आहे. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजु शेट्टी यांनी ईट येथील समारोप सभेला जाताना शहरातील पत्रकाराशी सवांद साधताना शनिवारी ता.५ रोजी व्यक्त केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी अभियानचा समारोप ईट ता.भूम येथे होणार असुन यासाठी खा.राजु शेट्टी जात असताना परंडा शहरातील डाॕ.आंबेडकर चौकात शेतकरी संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष रामेश्वर नेटके,कैलास पाटील, मारूती निळ,बाबाजान खान,जयंत पाटील,शिवाजी पाटील
अजिनाथ परबत,सत्यवान गायकवाड,शिवाजी घुगे,खंडु देडगे, गणपती कांबीलकर,सुमित लिमकर, आप्पा मुसळे, विशाल नेटके,रोहित नेटके,बबलू नलवडे आदीसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खा.शेट्टी यांचे आगमण होताच कार्यकर्त्यानी फटाके फोडून स्वागत केले.यावेळी बोलताना खा.राजु शेट्टी म्हणाले की, राज्यात मागील दोन महिन्या पासुन मान्सुनचा पाऊस कांही जिल्ह्यात जास्त झाला त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक भागात अद्यापही पाऊस नाही.पाऊसच नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत त्यामुळे माझा शेतकरी आर्थिक संकटात आहे.दुधाला सध्या २९ ते ३० रुपये लिटर भाव आहे तो ३५ रुपये करावा.शेतकऱ्यांच्या माल हमी भाव प्रमाणे फक्त ६ टक्के घेतला जातो उर्वरीत ९४ टक्के माल बजारात बेभाव विकावा लागतो यासाठी सरकारने हमी भाव कायदा केला तरच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गप्प आहे.ऊसाला १०० एफआरपी वाढवुन दिली परंतु खताचे भावात २२ टक्के वाढ केली तसेच मजुराची मजुरी वाढली आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टणाला फक्त ४५ वाढ मिळणार आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोडविण्यासाठी सरकारच्या विरोधात तिव्र अंदोलन करणार असुन यास यश मिळणार आहे…