दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड:(देगलूर); देगलूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात खिचडी भजे पाणीपुरी दहिवडा वडापाव यामध्ये टेस्टिंग पावडरचा मर्यादेपेक्षा जास्त वापर
देगलूर शहरामध्ये सध्या हॉटेल वडापाव व इतर अपहार ग्रहांचा खूप मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे खिचडी भाचे देगलूरच्या जुना बस स्थानक परिसर नवा बस स्थानक व लोहिया मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अल्प उपहार यांची हॉटेल व हातगाडी यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे परंतु या ठिकाणी बनविण्यात येणाऱ्या पदार्थात टेस्टिंग पावडर चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने देगलूरकर यांच्या आरोग्यास मोठी हानी पोहोचत आहे त्यामुळे अन्न व औषध पुरवठा विभागाने प्रत्येक हॉटेल्स तपासून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
देगलूर शहरात कोरोना संक्रमण संपल्यानंतर उपाहारगृहे व हात गाड्यावर वडापाव पाणीपुरी भजे मिरची यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे याशिवाय जुना बस स्थानक परिसर नवीन बस स्थानक या ठिकाणी खिचडी भज्यांची उपहारगृहे संख्या वाढली आहे परंतु या ठिकाणी विक्री होणारी विविध अन्नपदार्थ टेस्टिंग पावडर चा जास्त प्रमाणात वापर होत असल्याने येथील पदार्थ मोठी रुचकर व चवदार लागत असल्याने या ठिकाणी नागरिकांची व ग्रामीण भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात रिसेल वाढली आहे देगलूर शहर व तालुक्यातील बिलोली तालुक्यातील व मुखेड तालुक्यातील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रांतातील अनेक नागरिक येथे बाजार करण्यासाठी येतात व या ठिकाणी आल्यानंतर ते विविध येथील हातगाड्यावर तथा उपहारगृहात खिचडी भजे पावभाजी वडापाव आईस्क्रीम पाणीपुरी मिरची भजी व इतर अन्नपदार्थांचा आस्वाद घेत असतात परंतु येथील हॉटेल चालक व मालक यांनी या गोष्टीचा फायदा घेऊन आपल्या विविध अन्नपदार्थांमध्ये विविध रासायनिक घटकांचा वापर करून ती पदार्थ रुचकर व स्वादिष्ट बनविण्यासाठी या पदार्थांचा वापर करतात या ठिकाणी प्रसिद्ध असलेली पावभाजी आईस्क्रीम व इतर अनेक गोड पदार्थावर लहान बालके ही मोठ्या प्रमाणात ताव मारताना दिसत आहेत. त्यामुळे अशा रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याने नागरिकांना भविष्यात विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे असे असताना सुद्धा अन्न व औषध प्रशासना मार्फत या उपाहारगृहावर व हात गाड्यावर कोणत्याही अधिकाऱ्याचे या विषयाकडे कोणत्याच प्रकारचे अंकुश राहिला नाही कोणी या हॉटेल थाटा या वक्तीप्रमाणे देगलूर शहरात हॉटेल चालकांचा मोठा स्फोट झाल्याचे दिसते त्यामुळे अन्न व औषध प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही होत नाही या विभागातर्फे केवळ गुटखा पकडण्याचेच काम सुरू आहे त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडे हॉटेल उपहारगृहे भाजीपाला या विषयाकडे त्यांना वेळच नाही ते केवळ छोट्या मोठ्या पान टपरी वरील गुटख्यावरती धाड मारणार आणि आम्ही कार्यवाही केली असे सांगून परत निघून जाणार या दरम्यान तीन ते पाच दिवस गुटखा बंद राहणार एवढीच त्यांची कार्यवाही ठरलेली आहे परंतु अशा हॉटेलमधून नागरिकांना अक्षरशः विष देण्याचे काम सुरू आहे . आता तरी प्रशासनाने या विषयाकडे लक्ष घालून देगलूर शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी कशी राहील याकडे लक्ष दिले पाहिजे व अशा हॉटेल व हातगाड्यावर भेसळयुक्त अन्न तयार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांमधून चर्चा होताना दिसत आहे.