दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर ):
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव वर्ष अंतर्गत तालुका प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. याचा निकाल आज घोषित करण्यात आला असून त्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आले.
यामध्ये रांगोळी स्पर्धेत येथील मानव्य विकास विद्यालयाची विद्यार्थिनी कु. संचिता लाभशेटवार हीचा प्रथम क्रमांक आला आहे. तर द्वितीय क्रमांक साधना हायस्कूल ची विद्यार्थिनी खुशी चिंताकीकर तर तृतीय स्थान गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल या शाळेची विद्यार्थिनी लक्ष्मी पांचाळ हिने पटकावला आहे.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल शहापूर येथील कुमारी भाग्यश्री गुंटेलवार हिने प्रथम क्रमांक पटकावला असून मानव्य विकास विद्यालय ची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी देवकते ही सर्व द्वितीय आली आहे तर तृतीय स्थानावर ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी लक्ष्मी तोटावर आली आहे.
निबंध स्पर्धेमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शहापूर येथील कुमारी कार्तिकी यनगुलवार हे सर्वप्रथम आली आहे द्वितीय स्थानावर साधना हायस्कूल ची विद्यार्थिनी अवंती माने आणि मानव्य विकास विद्यालय ची विद्यार्थिनी अक्षरा गंटलवार हिने तृतीय स्थान पटकावला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास यावर प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये तालुक्यातील तडखेल येथील गजानन माध्यमिक विद्यालय ची विद्यार्थिनी श्रुती सावळे सर्वप्रथम आली आहे तर द्वितीय स्थानावर ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल देगलूर ची विद्यार्थिनी लक्ष्मी तोटावार आली आहे. तर तृतीय क्रमांक तालुक्यातील देगाव येथील एकता माध्यमिक विद्यालय ची विद्यार्थिनी अनुजा थडके हिने पटकावला आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार राजाभाऊ कदम, गट विकास अधिकारी शेखर देशमुख,पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख,सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे,गटशिक्षणाधिकारी डी.के. तोटरे आदींनी सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला.