दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी शिरूर तालुक्यातील उरळगाव परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. अधिकारी भेटीसाठी बोलवतात पण तिथे गेल्यानंतर त्यांची दालने कायम बंद असतात.मागील चार महिन्यांपासून येथे दुष्काळी परिस्थिती असून, गरज व मागणी लक्षात घेऊन चासकमान धरणाचे पाणी परिसरात सोडावे, अशी मागणी होत आहे.
उरळगाव परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी, मुगाची पेरणी केली होती . मात्र, पाऊसच न पडल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके हातातून गेली.परिसरातील ओढे-नाले कोरडे पडले आहेत. विहीर, बोअरवेलच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामस्थांबरोबर जनावरांनाही पिण्याचे पाणी कमी पडू लागले आहे.
या परिसराला फायदेशीर ठरणाऱ्या चासकमान प्रकल्पाचे पाणी लवकरच सोडण्यात येणार आहे, असे वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, महिना झाला तरी पाणी येथे पोचलेले नाही. त्यामुळे लाभधारक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तरी संबंधित विभागाने प्राधान्याने परिसरात पाणी सोडावे, अशी मागणी उरळगाव सोसायटीचे माजी अध्यक्ष नानाभाऊ सात्रस पोलीस पाटील सागर गिरमकर व अप्पासाहेब जाधव यांनी केली आहे.
या वेळी नामदेव गिरमकर, बाळासो सात्रस, प्रमोद गिरमकर, रघुनाथ गिरमकर, पोपट गिरमकर, सुनिता सात्रस, दादाभाऊ आफळे, राजेंद्र मुथा, शांताराम गिरमकर, केतन भट, पंडित गिरमकर, सुरेंद्र ठाणेकर, तुषार सात्रस, नंदाराम गिरमकर, भाऊसो काळे, बबन काळे, दत्तात्रय सात्रस, राजेंद्र सात्रस, सुरेश जाधव, भाऊसो जाधव आदी सह्यांचे निवेदन देण्यासाठी गेले असता अधिकारी दालनास कुलूप होते. सदर आमच्या मागणीची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे.
आमच्या संयमाचा बांद आता सुटत चालला आहे. आता जर आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळाले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल
– भीमराव कुदळे
शिवसेना विभागप्रमुख, रांजणगाव सांडस गण.