नाईक कारभारींचा पुढाकार अतुलनिय…
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी माधव गोटमवाड
नांदेड / कंधार
स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम १ ऑक्टोबर रोजी ग्राम पंचायत बिजेवाडी व मिनी अंगणवाडी भोजू तांडा यांच्या संयूक्त विद्यमाने राबवण्यात आला आहे. या उपक्रमात लहान बालकासह जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रतिसाद दिला.
‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकानी जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. यांचाच एक भाग म्हणून
‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
वैयक्तिक स्वच्छते इतकीच सार्वजनिक स्वच्छता ही महत्त्वाची असून त्यातून समाज, राज्य व देशाची एक सशक्त प्रतिमा निर्माण होते, ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. केंद्र सरकारच्या उपकृमा अंतर्गत रविवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक तास श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम मिनी अंगणवाडी भोजू नाईक तांड्यात अंगणवाडी सेविका संगीता मनोहर पवार यांच्या पुढाकारानी हनुमान मंदिर पासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत , काशिनाथ पवार यांच्या घरापासून ते प्रकाश गंगाराम जाधव यांच्या घरापर्यंत आणि नागोराव सोमला पवार यांच्या घरापासून ते शेषेराव नारायण जाधव यांच्या घरापर्यत अंगणवाडीतील लहान चीमुकल्यासह सर्व गावकऱ्यासह गावातील मुख्य रस्त्याची साफसफाई करण्यात आली आहे . या स्वच्छता अभियानात तांडयातील सर्वच नागरिकानी हातात झाडू , खोरे , फावडे ,टोपली , घेऊन सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावरिल सर्व घान स्वच्छ केली. या स्वच्छता मोहिमेत वयाच्या 92 वर्षातही कमलबाई जाधव व तुळसाबाई राठोड व मंगलबाई पवार हिने सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छतेचा वसा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासत आले असून या पुढेही तांडयातील तरून मंडळीना त्यांच्या पासून प्रेरणा घेण्या सारखे असल्याचे मुर्तिमंत उदाहरण जनतेसमोर मांडले आहे.
या स्वच्छता मोहिमेत कविता पिटू जाधव ग्राम पंचायत सदस्य बीजेवाडी ,
अंगणवाडी सेविका संगीता मनोहर पवार ,कमलबाई रामचंद्र जाधव , तुळसाबाई किशन राठोड , मंगलबाई सोमला पवार , देऊबाई मेघा जाधव , वय 92 वर्ष दुधाबाई नारायण जाधव , बायनाबाई बालाजी राठोड , सुमनबाई साहेबराव राठोड , शोभाबाई लक्ष्मण राठोड , शेषेकला शिवराम राठोड , राऊबाई बापूराव पवार , ललिता बालाजी पवार , संगीता बापूराव जाधव , विमल लालू जाधव , निर्मला भगवान जाधव ,
ॲड. भगवान जाधव, भोजू तांड्याचे कारभारी पवार बापूराव मारोती
सेवानिवृत्त शंकर राठोड , तांड्याचे नाईक माजी मु अ शिवराम भोजू राठोड, प्रा डॉ नामदेव राठोड , बालाजी राठोड , पिटूं लक्ष्मण जाधव शेषेराव जाधव , सत्यवान राठोड, वंसत जाधव , गजानन पवार , विजय जाधव , दुर्गा राठोड , मधूरा राठोड , आर्नव राठोड , आरव राठोड , आदेश राठोड , आनू राठोड , श्रेया जाधव , शर्वरी जाधव , आर्यन पवार , तेजस्वीनी पवार , रिया राठोड
आदी लहान चिमुकले तथा वयोवृद्ध महिला , पुरुष आणि प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित राहून ग्राम स्वच्छता करून आपला सहभाग नोंदवला.
निरोगी आयूष्य जगण्यासाठी स्वच्छता महत्वाची
तत्कालिन परिस्थिती संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन गावा गावात जाऊन ग्राम स्वच्छाता करून तत्कालिन ग्रामस्थाना स्वच्छतेचे धडे दिले. आता या धड्यांची आपल्याला केवळ उजळणी करायची आहे. आपण आपल्या परिसरातील ग्रामपंचायत तसेच गावा-गावांमध्ये शाळा , अंगनवाडी आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. रस्त्यावर साचलेला कचरा, नालीतील आडकलेला कचरा ,राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या तांड्यातील सर्वांच्या सर्व स्थानिक नागरिक प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुषानी स्वच्छतेसाठी आपण आपले योगदान देतील अशी अपेक्षा करतो.
केवळ आपण आपला घराच्या अजुबाजूचाच परिसर स्वच्छ करू या !
आपण आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी संपुर्ण महाराष्ट्रात राज्यासह भारत देश स्वच्छ आणि सुंदर होण्यास निश्चितच मदत मिळेल यात काही शंका नाही असे मत प्रा डॉ नामदेव राठोड यांनी यक्त केले आहे .
प्रा डॉ नामदेव राठोड
भोजू नाईक तांडा ( बिजेवाडी )
तांड्यातील नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभियानात मिनी अंगणवाडीच्या पुढाकाराने भोजू नाईक तांड्यातील नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक दिसून आला. यात माझ्या गावातील अंगणवाडीचे लहान बालकापासून ते वयोवृद्ध महिला पुरुषानी हिरिरीने सहभाग नोंदवून ग्राम स्वच्छ केले असल्याचे, अंगणवाडी सेविका संगीता पवार यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.
अंगणवाडी सेविका
संगीता मनोहर पवार
भोजू नाईक तांडा
आपण सर्व स्वच्छ व निरोगी राहू या…
भोजू नाईक तांड्यातील प्रत्येक नागरिकानी आपण आपल परिसर स्वच्छ व सुंदर ठेवला पाहिजे
निरोगी निरामय जीवन जगण्यासाठी गावातील प्रत्येक महिला पुरुष सदस्यानी सार्वजनिक ठिकाणी सांडपाणी आणि घान पसरवू नये
आपण आपल्या घराच्या समोर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेऊन आपण सर्व स्वच्छ व निरोगी निरामय राहू या असा शुभ संदेश उपस्थित गावकऱ्यांना ग्राम पंचायत सदस्य कविता पिटू जाधव हिने दिले.
– कविता पिंटू जाधव
ग्राम पंचायत सदस्या बीजेवाडी