गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
शेलगाव नगरीचे सरपंच मारोतराव पाटील कदम यांची महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात २.० मध्ये तालुकास्तरीय समीतीत तज्ञ व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली आहे.
शेलगाव मध्ये गेल्या १० वर्षांपासून तलावाचा गाळ काढणे , कंपार्टमेंट बल्डींग , वनराई बंधारे ,विहीर पुनर्भरण , सिमेंट नालाबांध , पाणी आडवा पाणी जिरवा , गाव व परीसत पाण्याची पातळी वाढवणे , गावामध्ये घर तेथे विहीर देऊन 99% लोकांचे सिंचनाचे प्रश्न सोडवले. तर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी , यांच्या मार्गदर्शनाखाली १००० पोत्याचा वनराई बंधारा गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदानातून करुन त्यांचे जलपुजन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते केले. मारोतराव पाटील शेलगावकर यांना आतापर्यंत शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार ,गांधी आंबेडकर पुरस्कार , विको हिलेज पुरस्कार , पर्यावरण पुरस्कार , तंटामुक्त पुरस्कार , तर समृदगाव प्लास्टिक मुक्तगाव , शाळा परिसरात तंबाखू मुक्त गाव सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेऊन शासनस्तरावर त्यांची जलयुक्त शिवार अभियानात तज्ञ यक्ती म्हणून निवड केली असुन या निवडीबद्दल गांवकरी मंडळीसह जिल्हाभरातुन शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.