गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
आझाद ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवेसाठी सदा अग्रेसर असणारे आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे असुन आज दि.२३ जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस असुन वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.
भीमाशंकर मामा यांचा जन्म लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. भीमाशंकर मामा कापसे हे लोहा तालुक्यांचे भूमीपुत्र आहेत .
त्यांची जन्मभूमी जरी लोहा तालुक्यातील रिसनगाव असले तरी त्यांची कर्मभूमी ही पुणे शहर आहे.
भीमाशंकर मामा हे शहरात रोजगाराच्या शोधात गेले होते त्यांनी सुरुवातीला अनेक कंपन्यांमध्ये कबाडकष्ट केले.
आपल्या कष्टाच्या जोरावर व अंगी जिद्द मेहनत चिकाटी बाळगून त्यांनी काही वर्षांनी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केला तोंडात साखर व डोक्यावर बर्फ घेऊन चांगल्या सोबत चांगले राहणे अन्यायाला कुठे थारा न देणे . आपला कोट्यवधी रुपयांचा उद्योग व्यवसाय उभारून गाडी, बंगला ,बॅक बॅलन्स सर्व काही असताना सुद्धा आपण समाजाचे काही देणे घेणे लागतो
म्हणून त्यांनी आपला उद्योग व्यवसाय सांभाळून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून घेतले.
समाजातील गोरगरीब, कष्टकरी, नागरिकांना, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी लोकहित सर्वपरी हे घोषवाक्य घेऊन आझाद ग्रुपची स्थापना केली.
भीमाशंकर मामा यांनी स्थापन केलेल्या
आझाद ग्रुप या सामाजिक संघटनेला लोहा, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर ,पुणे, नगर,बीड, सह संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन हजारो कार्यकर्ते आझाद ग्रुपचे तयार झाले आहेत.
भीमाशंकर मामा कापसे यांनी आपली आझाद ग्रुप ही सामाजिक संघटना राजकारणापासून दूर ठेवली आहे. कुण्याही राजकीय पक्षांचा आझाद ग्रूप शी संबंध नाही आझाद ग्रूप संघटना ही स्वतंत्र विचारांची पुरोगामी विचारांची संघटना आहे.
महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहित सर्व महामानवाच्या विचारांची प्रेरणा घेऊन चालणारी संघटना म्हणजे आझाद ग्रूप संघटना आहे आणि भीमाशंकर मामा कापसे यांनी ‘ लोकहित सर्वपरी ” हे घोषवाक्य घेऊन आझाद ग्रुपची स्थापना केली आहे.
आझाद ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवेसाठी सदा असणारे भीमाशंकर मामा कापसे यांनी कोरोना व लाॅकडाऊनच्या काळात अनेक रुग्णांना, गोरगरिबांना मदत केली, तसेच लोहा येथील एका गरीब कुटुंबात अभ्यासात हुशार असणारा मुलगा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पात्र ठरून त्याला प्रवेशासाठी फी साठी आर्थिक चणचण भासत असताना त्यांच्या मदतीला भीमाशंकर मामा कापसे धावून आले त्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत केली, लोहा तालुक्यातील रिसनगाव व पालम तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये परिस्थितीशी लढायला शिकावे आपले जीवन अनमोल आहे असा संदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
भीमाशंकर मामा कापसे हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात सदा अग्रेसर आहेत. आपला उद्योग व्यवसाय सांभाळून ते समाजसेवेसाठी आझाद ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत.
आज दि.२३ जानेवारी रोजी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांचा वाढदिवस असुन त्यांना ईश्वर चांगले निरोगी व दिर्घ आयुष्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.
विलास सावळे
तालुकाध्यक्ष मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघ लोहा,
लोहा तालुका प्रसिद्धी प्रमुख आझाद ग्रुप…