डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं-
प्रा. डॉ.पुरूषोत्तम धोंडगे
गोविंद पवार / नांदेड
लोहा तालुक्यातील गुराखी गडावर ज्ञानहंडी फोडून २९ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाला दि. २६ जानेवारी पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे .
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक शाहिर नामदेव चमकुरे होते तर उद्घाटक शाहिर नरसिंग ठाकूर होते व स्वागताध्यक्ष प्रा.डाॅ. पुरुषोत्तम धोंडगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, ॲड मुक्तेश्वर धोंडगे, प्राचार्य अशोक गवते आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व माजी आमदार दिवंगत भाई केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून सुरुवात झालेल्या व मध्यंतर काळापासून खंड पडलेल्या तीन दिवस चालणाऱ्या २९ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचा प्रारंभ दि. २६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात गुराखी गड तालुका लोहा येथे प्रारंभ झाला.
प्रथमतः पायी दिंडी पदयात्रा कामाईच्या झऱ्यापासून पासून लोहा येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालय, कुरुळा व कौठा श्री शिवाजी विद्यालयासह आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी कंधार – लोहा रोड मार्गावरुन लेझीम ,टाळ, मृदंगाच्या वाद्यांच्या गजरात वेगवेगळ्या पोशाखात असलेल्या विद्यार्थ्यी, समाजातील सर्व स्तरातील लोकांचे दर्शन घडून आले.गुराखी,सालदार राजे,पोतराज,वासूदेव,बहुरूपी बैलवाले, शाहीर,देवकर,राईंदर, विविध नृत्यन करत लमाणी गीताचे गायन लमाणी माता भगिनी,गोंधळी अशा असंख्य विविध ग्रामीण कलाकारांनी देखाव्यांसह सजून नटून-थटून मूळ कलागुणांना वाव देत पायी दिंडी पदयात्रा गुराखी गडावर धडकली. सर्वांनीच जणू जागतिक साहित्य संमेलनातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकून डोळ्याचे पारणे फेडले.
पायी पदयात्रा आगमना प्रसंगी प्रथमतः गुराखी ध्वजारोहण जागतिक गुराखी राजांच्या हस्ते संपन्न झाले.तसेच संमेलनाध्यक्ष शाहिर नामदेव चमकूरे,पांडुरंग कौसल्ये ,युवा किर्तनकार सदानंद गुरूजी रायवाडीकर,यावेळी उद्घाटक शाहिर नरसिंग ठाकूर व स्वागताध्यक्ष प्रा डॉ भाई पुरुषोत्तम धोंडगे यांच्या हस्ते ज्ञान हांडे फोडून संमेलनाला प्रारंभ झाला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना माजी आमदार गुरुनाथ कुरुडे म्हणाले की , शासन श्रीमंतांच्या साहित्य संमेलनाला २५-२५ लाख अनुदान देते पण या गरीबांच्या साहित्य संमेलनाला अनुदान देत नाही तेव्हा शासनाने गुराखी साहित्य संमेलनाला अनुदान द्यावे असे प्रतिपादन माजी आमदार गुरुनाथ कुरुडे यांनी केले.
पुढे बोलताना माजी आमदार गुरुनाथ कुरुडे म्हणाले की, जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे संकल्पक कै. भाई केशवराव धोंडगे यांनी नाहिरे वाल्यांना गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण केले आहे.
प्रास्ताविकात प्रा डॉ पुरूषोत्तम धोंडगे म्हणाले की, डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून गेली अठ्ठावीस वर्षापासून जागतिक गुराखी साहित्य संमेलन भरविले जाते. संमेलनात नाहीरे वाले, कुणबी राजे सरदार राजे गुराखी कलावंतांना आपल्या कला गुण गुराखी पिठावर सादर करण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ म्हणून जागतिक गुराखी साहित्य संमेलनात उपलब्ध झालेले आहे.त्यांच्या पश्चात केशवराव धोंडगे यांची उणीव आपण कदापि भरून काढू शकत नाही तरी त्यांच्या सर्वच शिवपरंपरा जोपासण्याचा प्रयत्न करू असा दृढनिश्चय व्यक्त केला.व्यासपीठावरील सर्वांचे आभार मानले.मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा आंदोलनाला पाठिंबा दिला.समाजातील सर्वच उपेक्षितांना , नाहिरेवाल्यांना न्याय द्यायचे काम करण्याचा शब्द दिला. डॉ. धोंडगे साहेबांनी स्वाभिमानाने मर्दुमकीने जगायला लढायला शिकवलं तो अधिकार गुराखी पीठाने दिला.ज्यांना कुणाला व्यासपीठावर संधी मिळत नाही त्यांना ही संधी उपलब्ध करून देवून गुराख्यांसाठी व्यासपीठ निर्माण करण्याचे काम धोंडगे साहेबांनी केले.
ज्याला कुणी नाही त्याला केशव आहे,गुराखी पीठ आहे असाही पुनरूच्चार पुरूषोत्तम धोंडगे यांनी केला.प्रास्तविकात बाबांच्या केलेल्या कार्याचा पाढा वाचताना, आठवणींना उजाळा देताना स्वागताध्यक्ष पुरूषोत्तम धोंडगे यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत दिवंगत भाई केशवरावजी धोंडगे यांच्या कार्याला अनेकांनी उजाळा दिला.प्रामुख्याने माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे, मुक्तेश्वर धोंडगे, माधवराव पेठकर , ज्ञानोबा गायकवाड,शंकरराव आंबटवाड,व्ही जी चव्हाण,प्रा.नागपुर्णे, डी एस बोधगिरे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.