दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे जालना
तालुक्यातील तळणी परिसरातील पुर्णा काठच्या उस्वद, देवठाणा,वझर सरकटे,भुवन,किर्ला,दुधा सासखेडा , कानडी,ईंचा,वाघाळा, टाकळखोपा या गावातील
वाळु माफियांनी हैदोस घातला असुन नदी पात्रातुन रात्रदिवस अवैध वाळू उपसा व अवैध वाळू साठ्यावरू वाळु वाहतुक करत नदी पात्रात मोठमोठाले खड्डे केले असुनन केलेल्या खड्यांची ईटिएस द्वारे मोजणी करा व या वाळु माफियांवर व संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी आज दि.12 फेब्रुवारी पासून पुर्णा नदी काठावर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर राठोड यांनी पेंडाल टाकुन आमरण ऊपोषण सुरू केले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते केदार कांगणे, शिवराज शिराळ सह अनेकांची उपस्थिती होती.
ऊपोषण कर्ते ज्ञानेश्वर रामदास राठोड यांना विचारले असता मी आजपासून उपोषणास बसलो असुन जोपर्यंत ईटिएस द्वारे मोजणी करून संबंधित वाळु माफियांवर व त्यांच्या वाहनांवर व शेत रस्ता देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकत नाही व हात ओले करून वाळु वाहतुक व ऊपसा करण्यास मदत करणाऱ्या महसुलच्या तहसिलदार,मंडळ अधिकारी,तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषणास बसणार व माझ्या जीवितास धोका असुन मला पोलीस संरक्षण देन्यात यावा अशी माहिती दिली.
या अगोदर 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले होते मात्र तळणी मंडळ अधिकारी भगवान घुगे व तलाठी साळवे यांनी माझी समजूत काढून आम्ही ईटिएस द्वारे मोजणी व संबंधितांवर कारवाई करतो असे लेखी पत्र दिल्याने मी आत्मदहन थाबविले परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नसुन सर्वच गावातुन बिनबोभाट रात्रंदिवस वाळु वाहतुक व ऊपसा सुरूच आहे.ज्ञानेश्वर राठोड…
यावेळी तळणी येथील सरपंच गौतम सदावर्ते यांनी भेट देऊन सांगितले की हा विषय अतिशय गंभीर असुन संबधितावर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे असे सांगितले...