दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव नवनाथ यादव
धाराशिव/भूम:-वकील मंडळाकडून मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला आहे.महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन घेऊन त्यात कायदा करावा. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आलेला आहे. या बंदला भूम वकील मंडळाचा पाठिंबा असल्याचे निवेदन दि १४ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनास देण्यात आले. यावेळी भूम वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड नवनाथ बाबर, उपाध्यक्ष ॲड घनश्याम लावंड, सचिव ॲड पाशा शेख, तसेच पी पी मोटे, पि टी गाढवे, ॲड रामराजे साळुंके, ॲड ए आर ढगे, ॲड सी.बी डंबरे, ॲड सोहेल शेख, व इतर विधीज्ञ उपस्थित होते.