दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी अख्खे सरकार कामाला लागले आहे. म्हणजे “बंदे में कुछ तो दम है*”सरकारला बंद खोलीतील चर्चा आवडते. जरांगे पाटील ऑन केमेरा चर्चा करतात. समाजाला हेच पाहिजे.मराठा क्रांती मोर्चा वेळी समन्वयक सरकारला मॅनेज झाले. समन्वयकांना पक्षाची पदे मिळाली, स्वतःची घरे भरली. पण समाजाचे मोठे नुकसान झाले.मॅनेज झालेला समन्वयक सरकारवर दबाव टाकू शकत नाही. मनोज जरांगे मॅनेज होत नाहीत.अजय बारस्कर सारख्या अतृप्त आत्म्यांची दुकानदारी मनोज जरांगे पाटील यांनी बंद केली. म्हणून ते जरांगे पाटील यांना बदनाम करीत आहेत. पण समाज पाटलांसोबत होता आणि आहे.
स्वतःची राजकीय, आर्थिक महत्वाकांक्षा असलेला आंदोलक समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नाही. मनोज जरांगे पाटील यांची वयक्तिक महत्वकांक्षा नाही. कित्येक वर्षांपासून त्याची आर्थिक परिस्थिती तशीच आहे. समाजाने दिलेल्या भेटवस्तू ठेवायलाही जागा नाही.
समाजासाठी कठोर उपोषणे करून, प्रचंड वेदना इतर कोणताही नेता सहन करेल असे वाटत नाही.मराठ्यांनी जरांगे पाटलांना डोक्यावर घेतले, हारतुरे दिले भव्य स्वागत सत्कार केले परंतु त्यांनी थोडीही हवा डोक्यात जाऊ दिली नाही देशातील कोणताही नेत्यांना विचारून निर्णय घेतला नाही. त्याउलट निर्णय घेऊन ते जनतेवर लादले जातात. मनोज जरांगे पाटील मराठ्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेतात.आंदोलकाने आंदोलन किती ताणायचे. कधी थांबवायचे. कधी पुढे न्यायचे हे समजले पाहिजे. तसेच नेत्यांशी चर्चा करताना मुत्सद्देगिरी लागते. ती जरांगे पाटील यांच्याकडे आहे. अक्खे मंत्रिमंडळ स्टेजवर खेचून आणले. मराठ्यांना शोभेल अशी स्पष्ट आणि रोकठोक भूमिका मंत्र्यांसमोर मांडणारा एकमेव नेता.
चौंडीच्या सभेत धनगर बांधव म्हणाले, “आमच्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासााषरखा नेता का नाही?”. मराठ्यांना मिळाला आहे. तो हरवायचा का? योद्धा जेव्हा शरण येत नाही. तेव्हा तो बदनाम केला जातो. तेच मनोज दादा जरांगे पाटलांच्या बाबतीत सध्या सुरु आहे. हे मराठा समाजाने समजलं पाहिजे.अशी सोशल मीडियावर मराठा समाज वास्तव मांडत आहेत.