दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/उमरी :- नांदेड जिल्हातील शेतकरी नेते तथा उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांनी मुबंई येथील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित येथील पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश केल्यानंतर कवळे गुरूजी यांचे कट्टर समर्थक सर्व कार्यकर्ते माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,माजी आमदार अमरनाथ राजूरकर, उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरूजी,यांच्या प्रमुख उपस्थितीत डाॅ.शंकरराव चव्हाण साखर कारखाना वाघलवाडा येथे ता.२० मार्च रोज बुधवारी सायंकाळी
भाजप पक्षात माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, माजी सभापती बाबूनाईक,प्रभाकरराव पुयेड, गणेशराव पाटील ढोलउमरीकर, संतोष सरसे,साईनाथ वाघे,संतोष सावंत, श्रीराम पाटील जगदंबे, नागनाथ पाटील, विलास नरवाडे,पाडुरंग पाटील वाघलवाडेकर,व्यंकटराव पाटील, सुरेश देशमुख तळेगावकर, किशन राठोड, सोनु वाघमारे,उत्तम आयेवार,राजेश वर्मा शेख मुस्सा,साईनाथ मुटकूटवार,पंडीत बेबरे,भारतबाई दुधबे,मारोती उमाटे,मारोती वाघमारे,देविदास पहेलवान,भुजंगराव पाटील,यासह यांनी यासह उमरी,धर्माबाद, नायगाव आधी असंख्य कार्यक्रत्य तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन ,ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्राम पंचायत सदस्य,तंटामुक्ती आजी,माजी अध्यक्ष, ठेकेदार, आधी पक्ष प्रवेश केले. प्रस्ताविकात संजय कुलकर्णी म्हणाले जिल्हाचा विकासाचा महामेरू सर्वाना सोबत घेऊन जाणारे एकमेव अशोकराव चव्हाण यांच्या शिवाय पर्याय नाही,यात मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन हा प्रश्न सोडवावा,तसेच कवळे गुरूजी यांनी भागात अनेक उद्योग ऊभारून शेतकरी,बेरोजगार युवकांच्या हाताला काम दिले,कवळे गुरूजी व राजेश पवार या भागाचा कायापालट करतील.कार्यक्रत्यावर अन्याय होणार नाही यासाठी अशोकराव चव्हाण यांनी धाऊन यावे असे श्री.कुलकर्णी असे म्हणाले.
मारोतराव कवळे गुरूजी मनोगतातुन व्यक्त
—-
करताना म्हणाले मराठवाड्यात कै.शंकरराव चव्हाण साहेब यांनी जलसिचनाचे काम केले,अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंञी झाले तेव्हा मोठा विकास झाला, सेनापती आदेशानुसार मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरलो तेव्हा काॅग्रेस पक्षाच्या लोकांनी मला पराभूत केले.काँग्रेस पक्षात अशोक चव्हाण यांची घुसमट होत होती तेव्हा अशोकराव चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केले,रस्ताचे मोठ्याप्रमाणात कामे झाले,गोदावरी नदीवरील बॅरेजेस झाले चव्हाण साहेब जिथे गेलात आम्ही तिथे गेलोत असे कवळे गुरूजी म्हणाले,मी कष्टाने व जनतेच्या आर्शिवादाने सगळे उद्योग उभे केलो,भागाचा शेतकरी सुधारायचे झाले तर उद्योगा शिवाय पर्याय नाही,दरवर्षी अडीच ते तिनशे कोटी कोटी रुपये ऊसपोटी शेतक-याच्या खिशात जातात,कर्मचाराचा पगार तिन कोटी रुपये दर महिंन्याला करतो,मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे प्रश्न सोडवतील अशी आशा असे कवळे गुरूजी व्यक्त केले,मराठा आरक्षण, जलसिंचन,उपसा सिंचन, गोदावरीचे पाणि मन्याड धरणात सोडवतील, सिंचना शिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही,असे कवळे गुरूजी म्हणत मी कोणतीच गळ घातली नसुन माझ्या शेतक-याकडे लक्ष द्या असे म्हणाले,सर्वानी एकञ येऊन विकासाला साथ द्या असे म्हणाले,चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असे आश्वासन कवळे गुरूजी यांनी दिले,
आ.राजेश पवार,म्हणाले अशोकराव चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने चांगला नेता पक्षाला मिळाला, जिल्हालाच नव्हे तर राज्याला विकासाचा फायदा होईल, कवळे गुरूजी सारखे मोठे उद्योजक पक्षात प्रवेश केले अजून विकास कामात भर पडले,वेळोवेळी शेतक-यांचे आर्थिक बळकट करण्याचे काम केले.मी आमदार या नात्याने शासनाकडून भागातील सिंचनाचे प्रश्न, बारुळ प्रकल्पाचे प्रश्न,भागातील कालवाचे कामे मार्गी लाऊ,रस्ते, विज शेतक-यांना बारा तास मिळावे त्यासाठी पर्यत करु,मराठा आरक्षण देण्याचे कटिबद्ध आहे.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले “गुरूजी” भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष हा सन्मानाचा आहे. कवळे गुरूजी ना आमदार कसे करायचे ते आम्ही योग्य वेळी निर्णय नक्कीच घेऊ, असे चिखलीकर म्हणत भाजप पक्ष हा विकासाचा पक्ष आहे.कवळे गुरूजीना साथ देण्याचे काम करु असे म्हणाले.
अशोकराव चव्हाण म्हणाले या भागातील चव्हाण घराण्यावर प्रेम करणारे कवळे गुरूजी च्या रुपात मिळाले,मराठवाड्यातील जास्तीचे खासदार निवडून आणण्याचे काम जिम्मेदारी करु,पूर्वीचा कडवा शिवसैनिक संजय कुलकर्णी हा हाही पक्षात आला, लोक म्हणाले अशोकराव चव्हाण निर्णय कसे घेतले.मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचे नैञत्व आहे,म्हणून मी पक्षात गेले,राममंदिराचा प्रश्न मोदी साहेबांनी सोडवले,तिर्थविकास,विमानतळे,रस्ते,सिंचनाचे कामे,देशाचे प्रश्न मोदि साहेब सोडवले,अनेक निर्णय घेत असताना देशाचे विकासाचे मोठमोठे निर्णय घेतले ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून मोदी यांच्या नैञत्वावर विश्वास ठेवून जिकुन येतील,आगामी काळात पाच खासदार नांदेड जिल्हाला मिळणार आहे.चिखलीकर व राजेश पवार व मी कधीच व्यासपीठावर कधीच आलो नव्हतो आता आलो.भाजपाचा विश्वास व देशाचे मोठे सभागृह मला संधी मिळाली,यापुर्वी मी विधानसभा,लोकसभा पाहिले आता राज्यसभा मिळाले,यासंधीचा फायदा मी जिल्हा साठी करणार, निर्णय घेत असताना मुख्य प्रवाहात येवावे लागेल यासाठी पक्षात आलो,मोदी अमितशाहा,फडवणिस, बावनकुळे यांचे अभार म्हणतो ,मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे मला तळमळ आहे,न्यायप्रविष्ट आहे ते ही मिटले पाहिजे, सगेसोयरे जीआर मिटला पाहिजे,सहा जुन नंतर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे.मी जेव्हा जरागे यांना भेटायला गेलो तेव्हा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी जरागे कडेऐ जाऊन मी मराठा समाजाचे प्रश्न सोडवणार, मराठवाड्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण, शोशल मिडियासमोर अनेक चुकीचे काहीतरी टाकायचे त्यातुन वेगळेच घडवाये असे काळजी घ्यावे लागेल,कवळे गुरूजी तुम्ही उद्योग क्षैञात भरारी घेत आहात , तुम्ही कारखाना चालवता म्हणून हा वाघलवाडा दिला.हा कारखाना गुरूजी चालवत आहेत.त्याचे आभार मानतो भागातील शेतकरी मुबलक ऊस वाढवा शेतक-यांना न्याय देण्याचे काम गुरूजी करतात,भागातील बाबळी प्रश्न व सिंचनाचे प्रश्न सोडवू, कारखानदारी चांगली चालली पाहिजे त्यासाठी आगामी काळात कवळे गुरूजीना साथ देऊ, देशातील सर्व राज्यातील चारशे पेक्षा जास्त जागा जिंकायचे आहे.हे मोदी करतात हे देशाचे भाग्य आहे.मुस्लीम अबू राजा हा हिन्दू धर्माचे मंदिर बांधतात,देशाचे झीटेव्टी होते अध्यक्ष मोदी होतात हे देशाचे भाग्य काय आहे.मी काॅग्रेस मध्ये असतांना कधीच पाहिली नाही,मराठवाड्यात बुलेट ट्रेन आणु, समुद्री महामार्ग आणले ,विमान वाहतूक चोविस तास सेवा चालु करु,नादेड ते बासर १४०० कोटी रुपयेचे सिमेट रस्ता केले,पायाभूत सुविद्य सर्व करु,ओबीसीला न्याय दिले पाहिजे त्यासाठी मोदी पंतप्रधान झाले तर सर्व कामे होणार त्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मी निवडून आणारच असे अशोकराव टनकाऊन सांगितले ,जिल्हातील सर्वच पक्षाचे आमदार,कार्यक्त्य कामाला लाऊन निवडून आणु,यापुर्वी मी निवडणूकीत होते तेव्हा नायगाव चे चव्हाण यांनी हात दिला ते मी विसरत नाही,तोच आता मी चिखलीकर यांना निवडून देणार कवळे गुरूजी तुम्ही उद्योग व राजकीय क्षेत्रात गुरू आहात राजेश पवार यांना सहकार्य करत चिखलीकर यांना निवडून देऊ,याभागात अमुल्य ग्रह कवळे गुरूजी आहात म्हणून.म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून कवळे गुरूजी पक्षात प्रवेश केले,अशा विश्वास देत येणारे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकवू असे शेवटी म्हणाले.
यावेळी राजेश कुंटूरकर ,शिवराज पाटिल होटाळकर,श्रावण पाटील भिलंवडे, बालाजीराव बच्चेवार,विक्रम देशमुख तळेगावकर, किशोर देशमुख,प्रविण गायकवाड,जगन शेळके,रविंद्र आण्णा पोतकटिवार,अशोकराव पाटील मुगावकर,सुधाकर देशमुख, अमोल ढगे, सुभाष पेरेवार, राजीव पाटील,गजानन श्रीरामवार, किशोर पाटील लगळुदकर, मुसळे,मारोतराव शंखतितकर,संदिप पाटील कवळे,परमेश्वर पाटिल कवळे,आधी उपस्थित होते.
उमरी तालुक्यातील अनेक प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ता. २०रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने उमरी,धर्माबाद व नायगाव तालुक्यात काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे…