दैनिक चालु वार्ता
प्रा.मारोती बुद्रुक पाटील
“दोस्तों इनकी तारीफ की जरूरत ही क्या है,
फुल जब पाससे गुजरते है तो महेक आती है|”
मित्रांनो, फुलाला रंग घेण्यासाठी कोणत्या चित्रकलेचा कोर्स करावा लागत नाही, किंवा गंध घेण्यासाठी कुण्या परफ्यूम किंवा अत्तराकडून उसनवारीही करावी लागत नाही, तर ते फुल ज्या मातीत रूजते,वाढते,फुलते त्याचं मातीत त्या फुलाचे रंग व गंध असतात. आज मी आपल्याला अशाच यशाचे उत्तुंग शिखर गाठलेल्या, नव्हे नव्हे आकाशाला गवसणी घालून देखील ज्यांचे पाय गावच्या मातीत घट्ट चिकटलेले आहेत अशा श्युन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका जिंदादिल व्यक्ती बाबत दोन शब्द सांगणार आहे.
संकटे कितीही आली तरी मी थांबणार नाही.त्या संकटाच्या ढिगार्यावर खंबीरपणे उभे राहून मी माझ्या ध्येय सिद्धी कडे वाटचाल करत राहील.हा ध्यास उराशी बाळगून, जिद्द,आत्मविश्वास विकसित करून यशस्वी कसे व्हायचे याचा प्रचंड आत्मविश्वास मनी बाळगून, सकारात्मक दृष्टी डोळ्यासमोर ठेवून, व समाजकार्याचा वसा घेऊन हजारो युवकांना नोकरी देणारे सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे जनकल्याणाच कंकण हाती बांधलेले तरुण तडफदार युवा संघर्षशील उद्योजक व त्याचप्रमाणे प्रयत्नशील…कार्यतत्पर…अभ्यासू… आणि आदर्श…असे सामर्थ्यशाली नेतृत्व” म्हणून मा.सदाशिव दशरथराव पाटील यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांची ओळख म्हणजे ते अतिशय मितभाषी, निर्व्यसनी, निगर्वी आणि माणसातला देव माणूस माणसे आणि मित्र जोडणारा मातृहृदयी आणि कनवाळू प्रसंगी कठोर असणारे मा.सदाशिवराव दशरथराव पाटील. म्हणजे हजारो युवकांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून नोकरी युवा उद्योजक होतं. हा माणूस प्रत्येकाला आपला माणूस वाटणारा, प्रत्येकाला मित्र म्हणून हवा हवासा वाटणारा, क्षितिजाच्या पलिकडे झेप घेणारा, मावळत्या सूर्यासंगे उगवणारा, प्रत्येक माणसाच हृदयात आपलं स्थान निर्माण करणारा माणूस म्हणजेच सदाभाऊ पाटील होय.
याशिवाय एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली ओळख आज मराठवाड्यामध्ये झाली आहे.औरंगाबाद सारख्या महानगरांमध्ये मित्रत्वाची जोडलेली फळी म्हणजे निश्चितच आपल्या कार्याची उत्तुंग भरारी दाखवते. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील चिखली या एका छोट्याशा खेड्यातील अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात मा.सदाशिव दशरथराव पाटील यांचा जन्म झाला. आदर्श बंधू म्हणून तुकाराम भैय्या पाटील यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे आपली उत्तुंग भरारी आकाशाला गवसणी घालते आहे.राजू भैय्या पाटील आणि आपण तुकाराम भैय्याला ईश्वर समान मानता. हा आपल्या मनाचा मोठेपणा कुटुंबिक जबाबदारीचे भान ठेवणार आहे.
भावाभावातील प्रेम हे अजूनही निश्चितच आदर्श आहे.एकत्र कुटुंब पद्धतीने हे मोठे कुटुंब आजही आनंदात नांदत आहे.हे आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असणारे आहे. कौटुंबिक परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षणावर अर्ध्यावरच पाणी सोडावे लागले.श्रीमंत होण्यासाठी शिक्षणच आवश्यक आहे असे नाही हेच दाखवून दिले सदाशिव पाटील यांनी.आज त्यांच्याकडे हजारो मानसे काम करतात नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे.हजारो लोकांचे संसार उभे करण्यात त्यांचा वाटा आहे.शून्यातून विश्व निर्माण करणारे द्वारकादास श्यामकुमार वस्त्र दालन संचालक म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे नाव उदयास आले आहे.
एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आता समाजात दिसू लागली आहे.आपल्या बुद्धीच्या शौर्याने आणि कार्याच्या पराक्रमाने ज्या सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाने आज आपल्या द्वारकादास शामकुमार परिवारात एक मानाचं आणि सन्मानाचं स्थान मिळवले.एक कार्यप्रवण, कार्यतत्पर ,आणि कार्यकुशल नेतृत्व म्हणून तडफदार,प्रमाणिक चारित्र्यसंपन्न,निर्व्यसनी,व निगर्वी अशा माणसाची राजकारणात सुद्धा गरज भासू लागली आहे.समाज आपल्याला एका वेगळ्या दिशेने पाहतो आहे. राजकारणात आपल्यासारख्या स्वच्छ प्रतिमेची माणसं जर आली तर समाजाचं कल्याण व्हायला वेळही लागणार नाही.
“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टविती परोपकारे”
या संताच्या उक्तीप्रमाणे आपल्याला गरिबीची जाणीव आहे.कष्टाची जाणीव आहे.लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आपण सदासर्वदा तयार असतात. जिथे कमी तिथे तुम्ही उभे राहता म्हणूनच आपल्याकडे एक नेतृत्व म्हणून समाजाची मोठी अपेक्षा आहे.घरून आपल्याला कितीही विरोध असला तरी समाजानी मात्र आपल्याला डोक्यावर घेतले आहे.मागच्या जिल्हा परिषदेला आपली 100% वर्णी लागणार होती परंतु आपण त्या ठिकाणी माघार घेतली.
आपल्या समाज कार्याची उंचीच एवढी मोठी आहे की आपण केवळ वस्त्र व्यवसायच न करता समाजातील दीन,दलित, शोषित,पीडित, उपेक्षितांच्या उद्धारासाठी आपण पुढे राहिला आहात.
स्वाधार, अंध अपंग पुनर्वसन केंद्र बुधोडा येथील मुलींचे दरवर्षी कन्यादान व अन्नदान,वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, सेवालय हासेगाव येथे अन्नदान,वर्धापन दिनानिमित्त रक्तदान, शिबिर, निळकंठेश्वर गोशाळा लातूर येथे गोमाता सेवा,आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत,माणुसकीची भिंत कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमातून आपल्या कार्याची ओळख समाजामध्ये आहे.
आपल्या बुद्धिमत्तेची आणि ज्ञानाची ओळख प्रत्येक कार्यामधून अतिशय धैर्याने करून दाखवली आहे.आपल्या विचारांच्या आणि निष्ठेवर प्रत्येकांच्या मनात नोंदवली आणि गोंदवली असे आहे. आदरणीय, आमचे प्रेरणास्थान व भावि जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. सदाशिव भैय्या पाटील आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या पावनघडीस आसमंत तोफांनी हादरवुन सोडावं
तुतारी-चौघडा, ढोल-ताशांच्या गजरात स्वराज्याच हे आसमंत निनादुन टाकावं;
रयतेत शाही हत्तीवरुन मिठाई वाटावी…
संघर्षरुपी जिवनातील या नविन स्वारीत
पुनश्चः विजयी व्हावं,
आपण झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागरही अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळननही पाहतच रहावं. पण सदाभाऊ आपल्याला नम्रपणे एक सांगणं आहे की, कृपया मागे वळून पहायला विसरू नका कारण
कुणीतरी या दिवशी “अंत:करणापासून” तुमच्या यशाची कामना करत असेल.
आपणास वाढदिवसाच्या ” सोनेरी ”शुभेच्छा.
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं
आभाळ अधिकधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावातुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत अणि एकंदरीत
तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
आपल्या आयुष्यात आपणास हवे मिळो हीच आपल्या जन्मदिनी ईश्वर चरणी प्रार्थना…आयुष्यवंत व्हा
यशवंत व्हा..कीर्तिवंत व्हावे,
आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य देवो आणि आपण सदासर्वकाळ असेच विजयी होत रहावे हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करण्यासाठीच हा शब्दप्रपंच. धन्यवाद
आपलाच हितचिंतक.
प्रा.मारोती बुद्रुक पाटील.
अहमदपूर जि.लातूर.
सं.अध्यक्ष.जगद्गुरू तुकोबाराय प्रबोधन प्रतिष्ठान महाराष्ट्र.