दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
आघाडी सरकार मधले घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस, शिवसेना असून वाडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊस मधे झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्या विरोधात
व देशातील शेतकरी, कामगार,व्यापारी यांच्या जगण्याचा निर्माण झालेला प्रश्न,याला केंद्र सरकार व त्यांचे चुकीचे धोरणे व निर्णया मुळे निर्माण झाला असून महा आघाडीच्या महाराष्ट्र बंद बाबत वाडा शहरात सुद्धा बंद पाळण्या बाबत चर्चा झाली असून वाडा शहरातील व्यापारी संघटनने सूध्दा बंद पाळून सहकार्य करावे,असे निवेदन वाडा तालुका राष्ट्रवादी पक्षाने महाआघाडी च्या वतीने व्यापारी संघटनेला केले.