भारतात देवीची एकून सोळा शक्तिपीठे आहेत.त्यातील साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहे .कोल्हापूर , तुळजापूर , माहूर , व वणी ही साडेतीन पीठे समजली जातात .ही सर्व पीठे वेगवेगळ्या देवींची असली तरी मूळ शक्ती एकच आहे . जिज्ञासू दृष्टीने पाहायचे असेल तर जेथे देवीला शेंदूर असेल ते रूप पार्वतीचे समजावे व जेथे कुंकू असेल त्या रूपाला लक्ष्मीचे रूप समजावे .
कोल्हापूरचे मंदिर श्रीयंत्रावर उभे केलेले आहे .मंदिराचे खांब मोजता येत नाहीत. कोल्हपूरची देवी
शिवस्वरूप आहे . तिच्या मस्तकावर शिवलिंग आहे . तिच्या वरच्या दोन हातात गदा व ढाल आहे तर डाव्या हातात महाळुंग आहे . महाळुंग म्हणजे एकप्रकारचे फळ. खालच्या उजव्या हातात भोजनपात्र आहे . कोल्हापूरच्या देवीचे लक्ष्मीचे रूप आहे.तुळजापूरच्या देवीचे दुर्गेचे रूप आहे.श्रीरामाला अरण्यात जात असताना याच भवानी देवीने मार्गदर्शन केले म्हणून तिला रामवरदायिनी असेही म्हणतात. परशुरामालाही तिनेच मार्गदर्शन केले होते. शिवाजीमहाराजांना तिने तलवार दिली होती . या भवानी देवीची चल मूर्ती आहे. चलमूर्ती म्हणजे तिची जागा बदलता येते.
नवरात्रोत्सव झाल्यानंतर देवीला चार दिवस विश्रांतीसाठी बिछानाघरात
झोपवतात.
माहूरची रेणुकादेवी ही पार्वतीचे रूप आहे . इथे देवीचे सर्वांग नसून देवीचा मुखवटा आहे.
त्यामुळे देवीचे मुखपूजन आहे .हे अतिशय पवित्र ठिकाण आहे .
वणीच्या देवीचे डोंगरामध्ये स्वयंभू रूप आहे . डोंगरात असल्यने तिचे दर्शन पूर्वी दुर्लभ होते परंतु आता वरपर्यंत वाहनाने जाता येते .हे देवीचे पार्वतीचे रूप आहे . मार्कंडेय ऋषी काय बोलत होते हे ती कानाला हात लावून ऐकत आहे अशी ती मूर्ती आहे……..
वणीच्या देवीला अठरा भुजा आहेत .तसेच तिला अठरा वाराचे पातळ लागते.
सगळ्या देवी या शक्तीदेवता आहेत . मानव जातीचा उध्दार करण्यासाठीच त्या शक्तीने निरनिराळ्या काळात तशी रूपे घेतली आहेत . खरे पाहता सर्व देवींचे रूप कुमारिकेचेच आहे . याचाच अर्थ ५ ते ८ वर्षाच्याच आहेत ; परंतु आपण त्यांना मान देण्याच्या उद्देशाने सौभाग्यालंकार म्हणजेच साडी , मंगळसूत्र , जोडवी व खण-नारळ ओटी भरत असतो . जर देवी कुमारिकेचे रूप आहे , तर त्यांना कुमारिकेचीच वस्त्रे अर्पण केली तरी चालण्यासारखे आहे .