दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे देशात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असताना आज ही ग्रामीण भागातील रस्ते पूल वीज पाणी आरोग्य या सह मूलभुत सुविधा अद्याप ही पोहचल्या नाहीत याचा प्रत्यय ग्रामीण भागात दिसून येत आहे देऊळगाव ते बेरळी तीन की मी अंतराच्या रस्त्यासाठी देऊळगाव येथील तीनशे गावकऱ्यांनी रस्त्यावरील खड्डयात बसून अमृत महोत्सव दिनी धरणे आंदोलन करून प्रशासन व लोकप्रतिनिधी चे लक्ष वेधून घेतले आहे
देऊळगाव हे गाव लोहा तालुक्यापासून अवघ्या सहा की मी अंतरावर आहे गावाची लोकसंख्या ही तीन हजार आहे येथील शेतकरी भाजीपाला शेती करतात याच मार्गावरून तीर्थक्षेत्र पेंडू येथील योगीराज निवृत्ती महाराज यांच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त जात असतात गावातील विध्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्यावरून जावे लागते वाहतूक ही मोठी असते असे असताना गेल्या चाळीस वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नाही यामुळे आहे त्या रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडली आहेत खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डा हा विषय चिंतनाचा बनला आहे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने शेतकऱ्याचा भाजीपाला वेळेवर तालुका ठिकाणी पोहचवता येत नाही यामुळे मोठे नुकसान होत आहे गरोदर महिलेचे बाळंतपण खड्यामुळे रस्त्यातच होत आहे विषारी औषध प्रशासन केलेले रुग्ण साप चावलेला रुग्ण हृदय विकाराचा रुग्ण अति गंभीर आजाराचे रुग्ण रस्त्या वर पडलेल्या खड्ड्यामुळे वेळेवर उपचारासाठी तालुका ठिकाणी घेऊन जाता येत नाहीत यामुळे विलंब होऊन रुग्णाचा जीव रस्त्यातच जात आहे अशा बिकट संकटाचा सामना गावकरी सहन करत आहेत देऊळगाव बेरळी रस्त्याचे काम करावे यासाठी गावकऱ्यांनी गेल्या वीस वर्षांपासून अनेक वेळा निवेदन देऊन मागणी केली परंतु वर्षासनाने दखल घेतली नाही अमृत महोत्सव दिनी तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी म्हणून गावकऱ्यांनी 10 अगस्ट रोजी रस्ता तात्काळ करावा अन्यथा 15 अगस्ट रोजी रस्त्यावरील खड्डयात हातात तिरंगा घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर खासदार सुदाकर श्रगारे आमदार शामसुंदर शिंदे तहसीलदार संबंधित बांधकाम विभाग पोलीस स्टेशन यांना देऊन आझादी का अमृत महोत्सव दिनी देऊळगाव येथील गावकऱ्यांनी हातात तिरंगा घेऊन रस्त्यावरील पाण्याने डबडबलेल्या खड्डयात बसून धरणे आंदोलन केले
या धरणे आंदोलनाचे नेत्रत्व सरपंच मारोती सोनवळे यांनी केले
सकाळी जी प प्रा शाळा , ग्राम पंचायत कार्यालय व सेवा सहकारी सोसायटी चा ध्वजारोहण झाल्यानंतर गावातील तीनशे च्या वर गावकऱ्यांनी हातात तिरंगा घेऊन रस्त्याच्या मागणीसाठी गावातून रॅली काढली व नारे घोषणा देत रस्त्यावरील खड्डयात बसून धरणे आंदोलन केले
यावेळी सरपंच मारोती सोनवळे माजी सरपंच रघुनाथ सोनवळे चेअरमन रमेश सोनवळे माजी चेअरमन डी एस सोनवळे ग्राम पंचायत सदस्य दता सोनवळे श्रीराम राऊत सचिन सोनवळे कोडीबा बंडेवार प्रभू राऊत प्रशांत सोनवळे व्हाईस चेअरमन विलास राऊत तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव सोनवळे शा व्य समितीचे अध्यक्ष शिवप्रसाद सोनवळे प्रभाकर टाले संचालक शिवानंद सोनवळे आनंदराव सोनवळे, पेमराव सोनवळे, रमाकांत सोनवळे, पत्रकार शेख मुर्तुजा माजी ग्राम पंचायत सदस्य कामाजी बंडेवार रंगनाथ जोंधळे ज्ञानोबा सोनवळे सखाराम सोनवने सुनील जोंधळे बबलू शेख प्रकाश राऊत शिवकुमार सोनवळे कामाजी व्यंकटी सोनवळे रसूल शेख माजी सैनिक माधव सोनवळे जयवंत सोनवळे अशोकराव सोनवळे वैजू पाटील, बालाजी पाटील राऊत ,गंगाधर राऊत अंकुश सोनवळे रामराव वाघमारे नामदेव मोकले नंदू सोनवळे गंगाप्रसाद सोनवळे माधव सोनवळे राजू शिवानंद सोनवळे नोमाजी सोनवळे निवृत्ती सोनवळे शेषराव बंडेवार सूर्यकांत बंडेवार
शिवाजी राऊत नामदेव आंबे
मोतीराम राऊत माधव भिंगे मारोती पांचाळ विजय वाघमारे नरहरी सोनवणे कपिल तिगोटे दिगंबर बंडेवार तुकाराम मोकले
नागुराव जोंधळे विजय राऊत भाऊराव पाटील राऊत गणपती बंडेवार संभाजी बंडेवार यांच्या सह तीनशे च्या वर गावकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते