दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:बिलोली तालुक्यातील केसराळी या गावांमध्ये शरद जोशी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
शेतकरी कोणत्याही जातीचा,धर्माचा,पंथाचा असला तरी त्याच्या अडचणी,समस्या,संघर्ष समान आहेत.*म्हणून,समस्त शेतकऱ्यांची एकच जात आहे,आणि ती म्हणजे “शेतकरी”.या विचाराने ज्या दिवशी समस्त शेतकरी जात एकत्र येईल,त्या दिवशी शासनव्यवस्था शेतकऱ्यांसाठी काम करेल.*
जगातला पहिला व्यवसाय शेती हाच आहे.
“पूर्वी उत्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नौकरी अशी समाजव्यवस्था होती.आज,शेती कनिष्ठ झाली आहे.” भारत हा कृषिप्रधान देश आहे.म्हणून,जो प्रयन्त शेती आणि शेतकऱ्यांचा विकास होत नाही.तो प्रयन्त देशाचा विकास होणार नाही.
शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक जोशी साहेबांना जयंतीनिमित्त पुन्हचं विनम्र अभिनंदन त्यावेळी गावचे सरपंच राजू मंनधरणे उपसरपंच मारुती माधाळे सोसायटी चेअरमन दीपक शिंदे पोलीस पाटील सायलू पांचाळ राजू केसराळीकर संग्राम मुद्दलवार गावचे प्रतिष्ठान नागरिक दत्तात्रय माडे राम काळे उमाकांत मठवाले देविदास काळे शिवराज काळे मल्लेश काळे गोविंद सावळे आधी गावकरी मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते