दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय कराळे
**************************
परभणी : वाहतूक पोलिसांच्या कारवाई नियमावलीत आता बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांवर कारवाई करताना खासगी मोबाईल वापरल्यास आता पोलिसावरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे.
वाहतुकीचे नियम मोडणे किंवा कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करणे यासारखे प्रकार सर्रासपणे होत आहेत. त्याची जाणीव असूनही वाहतूक नियमावलीचा अनादर करणाऱ्या त्या वाहन चालकांवर ई-चलनद्वारा कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. तथापि कायद्याचे रक्षक असूनही पोलिसांकडूनच जर नियमांना धाब्यावर बसविले जात असेल तर अशांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक यंत्रणेने नियमांत बदल केला आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकावर ई-चलनद्वारा कारवाई न करता खासगी मोबाईलचा वापर करण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. परिणामी कायद्याचेच रक्षक म्हणवणारे पोलीस वाहतूकीच्या नियमांना बगल देत असतील तर त्यांनाही वठणीवर आणण्यासाठी आता नियंत्रण कक्षाने कायद्याचा बडगा उचलला जाणे स्वाभाविक आहे. खासगी मोबाईलचा वापर जो कोणी कर्मचारी करेल आता त्यांच्यावरच कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कायदा धाब्यावर बसवू पहाणाऱ्या चे आता पूरते धाबे दणाणले जाणार आहेत एवढे नक्की.