दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – भारत आणि बांगलादेशने मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसिना यांच्या उपस्थितीत सात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि हसिना यांच्या नेतृत्वाखाली भारत-बांगलादेश शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा झाली.
त्यावेळी या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
दूसंचार, ऊर्जा, जलसंपत्ती, व्यापार आणि गुंतवणूक, सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा, विकास भागीदारी आणि प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बाबी दोन्ही देशांच्या अजेंड्यावर आहेत असे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
तत्पूर्वी, हसीना यांनी राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.स्वागतानंतर बांगलादेशच्या पंतप्रधानांनी सांगितले की, नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध लक्षात घेता प्रत्येक वेळी भारतात आल्याने मला आनंद होतो.
भारत हा आमचा मित्र आहे. मी जेव्हा जेव्हा इथे ये तो माझ्यासाठी आनंदाची बाब असते. आम्ही आमच्या मुक्तिसंग्रामात भारताने दिलेल्या योगदानाचे नेहमी स्मरण ठेवतो असे त्या म्हणाल्या. शेख हसिना या काल पासून चार दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत.