दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:
जनता हेच आपले भाग्य आहे असे प्रतिपादन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांनी नांदेड येथे आझाद फाऊंडेशन संचलित आझाद ग्रुपच्या पद नियुक्ती प्रमाण पत्र सोहळ्यात केले.
नांदेड येथील हाॅटेल गणराज पॅलेसच्या सभागृहात दि. २५ सप्टेंबर रोजी आझाद ग्रुपच्या नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सोहळा व पद नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे होते तर प्रमुख उपस्थिती आझाद ग्रुपचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद टाले पाटील, राज्य कार्याध्यक्ष अली फराज रिजवी, राज्य संघटक उध्दव जाधव, मराठवाडा संघटक तथा लांडगेवाडीचे सरपंच बाळासाहेब टोपारे, विनोद पाटील गवते , प्रदेश प्रवक्ते मारोती पाटील बुद्रुक, राज्य कार्यकारिणी सदस्य जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे , जिल्हाध्यक्ष बसवंत पाटील शेळगावकर, नामदेव रहाटकर ,एस व्ही.पांडागळे प्रसाद पोले, रूद्रा पाटील भोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना भीमाशंकर मामा कापसे म्हणाले की, आझाद ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देत आहोत . महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. महिलांना सुध्दा सन्मान मिळावा यासाठी आझाद ग्रुपचे ध्येय उदिष्ट आहेत..
लोकांनी मला विचारले की, राजकारणात पडणार आहात काय निवडणूक लढवणार आहात काय . एकीकडे आम्ही म्हणतो राजकारणात पडायचे नाही निवडणूक लढवायची नाही पण आमच्या आझाद ग्रुपचे मराठवाडा संघटक बाळासाहेब टोपारे यांनी निवडणूक लढवून सरपंच झालेत . वेळ प्रसंगी आझाद ग्रुप निवडणूक ही लढविणार. निवडणूकी मध्ये पैसे घेयायचे नाहीत पैसे देयायचे नाहीत हे आपल्या आझाद ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या पासुन सुरु करावे .
आझाद ग्रुपचे ब्रिद वाक्य आहे लोकहित सर्वोपरी या प्रमाणे या सर्व गोष्टी घेऊन आझाद ग्रुपचे काम करणार कुठल्याही गुंडयाला भिणार नाही . आझाद ग्रुप हे समाज हितासाठी काम करणार आहे असे भीमाशंकर मामा कापसे म्हणाले.
भीमाशंकर मामा कापसे यांनी प्रमुख मार्गदर्शन झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती चे पत्र देण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर डाकोरे यांनी केले.