दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
प्रतिस्पर्धी असलो, तरी दोन्ही टीम्स परस्परांचा आदर करतात” असं टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने म्हटलं आहे. प्रसिद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर 23 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.
अश्विन काय म्हणाला?
“हा क्रिकेटचा गेम आहे. आम्ही पाकिस्तान विरुद्ध फार क्रिकेट खेळत नाही. स्पर्धा खूप मोठी आहे आणि दोन्ही देशातील जनतेसाठी ती महत्त्वाची आहे. हार आणि जीत हा खेळाचा भाग आहे. खासकरुन या फॉर्मेटमध्ये जय-पराजयाच अंतर खूप कमी असतं. टीम म्हणून आम्ही पाकिस्तानचा आदर करतो. ते सुद्धा आमचा आदर करतात” असं अश्विन पत्रकार परिषदेत म्हणाला. टीम इंडिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील सामन्यानंतर अश्विन पत्रकार परिषदेत बोलत होता.
*पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय*
“वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगला सामना झाला. टुर्नामेंटमधील पहिला सामना खेळताना तुम्हाला परिस्थितीची माहिती असली पाहिजे” असं अश्विन म्हणाला. प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळवला.
पर्थमध्ये खेळपट्टीचा बाऊन्स आणि वेगाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये टीम इंडिया आहे. नव्या युवा खेळाडूंना याचा फायदा होईल, असं अश्विन म्हणाला.