दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: दिनांक 26 मार्च 2023 रोजी के.चंद्रशेखरराव
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे जाहीर सभा झाली.
तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र पक्षाचा लोहा येथील मोंडा परिसरात पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .या मेळाव्यात तेंलगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्र सरकारचा समाचार घेतला ,तेलंगणा राज्या शेतकरी, मजुरदार कष्टकरी यांच्यासाठी विविध योजना राबवितो मग महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांसाठी योजना का राबवत नाही येणाऱ्या काळात बि.आर.एस.पक्षाला साथ द्या महाराष्ट्र मॉडेल राज्य बनवू ,महाराष्ट्रात गुलाबी झेंडे फडकवले की महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार जमा झाले हि बि.आर.एस.पक्षाची किमया आहे असे के.चंद्रशेखरराव यांनी सभेला संबोधित केले
लोहा येथील मोंढा परिसरात भारत राष्ट्र पक्षाचा प्रवेश मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्याला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी असंख्य कार्यकर्त्यासह जाहिर प्रवेश केला या बरोबर माजी.आमदार हार्षेवर्धन जाधव, आंबेडकर चळवळीतील नेते सुरेश दादा गायकवाड, डॉ यशपाल भिंगे,हादगवचे चाऊस, नागनाथ घिसेवाड, शिख समाजातील चड,भास्कर जाधव,जि.प.चे माजी शिक्षण सभापती संजय क-हाळे, सुनिल धोंडगे,दिलीप दादा धोंडगे,शिवराज, राजकुमार केकाटे, संजय हांकारे, शाहिर गौतम पवार यांनी के.चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला.
यावेळी चंद्रशेखरराव म्हणाले आगामी पंचायत समिती निवडणूक असो जिल्हा परिषद निवडणूक असो स्थानिक पातळीवर गावा गावातील प्रत्येक निवडणुकीत गुलाबी झेंडा दिसुन येईल.
तेलंगाना राज्य मॉडेल राज्या म्हणून ओळखले आपन साद दिली तर त्याच धर्तीवर महाराष्ट्र मॉडेल राज्या बनवू.तेलगणात शेतकऱ्याला २४ तास मोफत विज दिली जाते, लक्ष्य कन्य योजना राबवली जाते, शिक्षणासाठी मदत केली जाते,तरुण युवकांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज दिले,कुटुंबातील प्रमुख सदश्याचा अचानकपणे मृत्यू झाला तर तात्काळ मदत दिली जाते,शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी सात हजार खरेदी सुरू केले आहे.
शेतकऱ्याला एकरी दहा हजाराचे अनुदान देण्यात येते आशा विविध योजना राबविण्यात येतात त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात येतील
जनतेनी भारत राष्ट्र पक्षाला येणाऱ्या काळात साथ दिली तर महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम करण्यात येईल.
महाराष्टाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता चंद्रशेखरराव महाराष्ट्रात का चकरा मारत आहोत आपन तेलंगणा थांबा महाराष्ट्रात येऊ नका असे म्हणाल्याने मी त्यांना सांगितले माझ्या राज्यात शेतकरी, मजुरदार,कष्टकरी यांच्या साठी योजना राबवता त्याच योजना आपन महाराष्ट्रात राबवा मी पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही जर आपन विविध योजना राबवल्या नाहीत मी प्रतेक निवडणूक गुलाबी झेंडा फडकविला जाईल असे त्यांना मी सांगीतले आहे म्हणाले.
महाराष्ट्रात गुलाबी झेंडे फडकविले की महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार जमा झाले हि भारत राष्ट्र पक्षाची किमया आहे.