दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- २०१४ मध्ये तेलंगण राज्याची निर्मिती झाली.अवघ्या ८/९वर्षात तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांनी शेतकरी,कष्टकरी,मध्यमवर्गीय लोकांसाठी विशेष योजना राबवून तेलंगणा राज्य समृद्ध केले आहे.
१) शेतकऱ्यांना २४ तास मोफत विज.
२) पेरणीसाठी अगोदर एकरी १०,००० रू.मदत. ३) नदी जोड प्रकल्पामुळे १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली.
४) शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यास ( अपघाती किंवा नैसर्गीक) कुटुंबीयांना ५,००,०००-रू.ची तात्काळ मदत.
५) सरकार स्वतः धान खरेदी करते.
६) दुःखद व आकस्मिक प्रसंगासाठी १०० टक्के प्रिमियम देणारी विमा योजना सरकार स्वतः राबवते. ७) शेतकरी मंच योजनेद्वारे ५००० एकर चा एक समुह करून त्यासाठी एक स्वतंत्र कृषी अधिकारी काम करतो.
८) कल्याण लक्ष्मी व शादी मुबारक योजने अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी १,००,१००/-रू.विना अट तात्काळ मदत. ९) जेष्ठ नागरिकांना व एकट्या स्रियांना दरमहा २०१६ रू.पेन्शन.
१०) दिव्यांगासाठी दरमहा ३०१६ रू.पेन्शन. ११) गरीब,गरजु लोकांना १०० टक्के अनुदानावर २बेडरूम किचन घरे दिली जातात. १२) दलीत व आदिवाशींना उद्योग करणाय्रांसाठी प्रोत्साहन योजना. १३) दलितांना प्रत्तेक कुटुंबास विना परतफेड १० लाख रू. एक रकमी दिले जातात. १४) धनगर बांधवांना पाळण्यासाठी मोफत मेंढ्या वाटप केल्या जातात.
१५) मिशन भगीरथ अंतर्गत शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी तर पिण्यासाठी प्रत्येक घरात नळ,स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा. १६) गरोदर व स्तनदा मातांसाठी मोफत सर्व आरोग्य सुविधा.बाळाच्या जन्मानंतर १२००० रू.तर मुलीच्या जन्मानंतर १३००० रू.संगोपनासाठी दिले जातात. १७) कंटी वेलमु जगातील सर्वात मोठे नेत्र शिबीर राबवले.
१८) आपले गाव आपली शाळा शिक्षण योजना राबवून शिक्षणावर भर.
यामुळे तेलंगणा एक समृद्ध राज्य झाले आहे.शेतकरी समृद्ध झाल्याने एकही आत्महत्या नाही.महाराष्ट्र राज्य तर नैसर्गीकरीत्या समृद्ध आहे.वरील सर्व गोष्टी महाराष्ट्रात करणे सहज शक्य आहे.पण राज्यकर्त्यांची तशी मानशीकता नाही. म्हणुन तमाम शेतकरी पुत्रांनी कष्टकय्रांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बेगडी प्रेम दाखवणाय्रा सर्वच पक्षांना विचारले पाहिजे की, जे तेलंगणात होवू शकते ते महाराष्ट्रात का नाही?