दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- कंधार तालुक्यातील मंगनाळी ते पेठवडज रोडच्या बाजूस नाली काढून बांधण्यात आली असून पेठवडज शिवारातील शेतकरी गोविंद शेषराव पांढरे यांच्या शेती जवळील दोन्ही बाजूंनी नाली भुजवली नाही. शेतकर्यांनी गुत्तेदार राजेश जाधव यांना ही गोष्ट सांगितली असता ते म्हणतात जेसीबी वाल्यांना सांगा ते भूजवतील जेसीबी वाल्ये म्हणतात गुत्तेदाराना सांगा दोघेही एकमेकांवर चालढकल करीत आहेत. पावसामुळे शेती वाहुन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकर्यांची नाली भुजवून देण्याची मागणी गोविंद शेषराव पांढरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.