दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे ग्रामीण भागातील वीज ही दिवसा आणि रात्रीच्या वेळेला गायब होते यामुळे नागरिक हैराण त्रस्त होत आहेत. ग्रामीण भागात आणि गावात रात्रभर लाईटच नसते नागरिक वीज वितरण कंपनीकडे विचारपूस केली असता कोणीही प्रतिसाद देत नाही नागरिक हतबल झाली आहेत
तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे तालुक्यामध्ये दोन दिवसापासून अवकाळी पावसाने वसंती घेतली आहे सतत कोसळणारा अवकाळी पाऊस थांबल्यामुळे उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढल्याने उखाडा मात्र जादा प्रमाणात होत आहे.
काही भागात रात्रभर तर बहुतांश भागात दिवसभर लाईट बिल होत असल्या कारणाने | नागरिकांची मोठी डोकेदुखी होत आहे वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात साधा वारा आला तरी लाईट जाते यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहेसहा मे रोजी उष्णतेच्या तीव्रतेचा भास नागरिकांना जाणवत असल्याने लोकाला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे याच कारणाने नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
दुरुस्तीचे कामे महावितरण पावसाळ्यापूर्वी करायला असतात ती पण अद्याप सुरू केली नाही. त्याबाबत कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांनी ही मोहीम राबवून नागरिकांना रात्रीच्या वेळी वीज पुरवठा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे तालुक्यातील नागरिकांना रात्रीच्या वेळी वीज मिळत नाही . आणि गावात रात्रभर लाईटच नसल्यामुळे नागरिकांना झोप यावी रात्र जागरण करून काढावी लागत आहे . अनेक गावातील नागरिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे मारूनही अधिकारी दाद देत नसल्यामुळे याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊजामंत्री देवेंद्र फडणीस यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.