दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती :-आकृतीबंध तातडीने लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह आपल्या इतरही प्रलंबित मागण्यांकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचारी यांनी आज सोमवार ८ मे रोजी दोन तासाचे लेखणी बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
मोटार वाहन विभागाच्या आकृतीबंधास २३ जानेवारी २०२३ रोजी शासन मान्यता मिळाली आहे.आकृतीबंधास सहा महिन्यांहून अधिक काळ होऊनही आकृतीबंध कार्यन्वित न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व संतापाची भावना निर्माण झाली आहे.मोटार वाहन विभागात (आर.टी.ओ.) सर्व राज्यात परिवहन विभागातील कामकाजाची एकसूत्रता आणण्याकरिता तसेच कर्मचाऱ्यांची वर्ग २ ची पदोन्नती गेली ५-६ वर्ष होऊनही झाली नाही.दीड वर्षापासून कळसकर समितीचा अहवाल सादर होऊन त्याची अंमलबजावणी केल्या जात नाही.परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना आकृतीबंधाच्या नावाखाली पदोन्नती रोखून धरल्या आहेत.राज्यात कामकाजात एकसूत्रता आणण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमुळेच कळसकर समिती गठीत करण्यात आली.समितीचा अहवाल प्रशासनास दिड वर्षापूर्वीच सादर झाला आहे.प्रदीर्घ काळ होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामकाजात राज्य स्तरावर सुसूत्रीकरण साधले जात नाही.परिणामी कर्मचाऱ्यांवर नाहक कारवाई होत असल्याचे दिसून येते.यामुळे जनतेस नाहक त्रास होत आहे.पुरेसा अवधी देऊनही शासन-प्रशासनाने रास्त मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.त्यामुळे परिवहन विभागातील कर्मचारी नाराज आहेत.त्यांची नाराजी ८ मे रोजीच्या निदर्शने व लेखणी बंद आंदोलनाने व्यक्त झालेली आहे.
सदर आंदोलन मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर यांचे नेतृत्वात या आंदोलनात मीना मडावी,संगीता भिलावेकर,मीनल गिरे,रोहिणी दातार,सुचिता होले,मनीषा भस्मे,शीला मोरे,अक्षय राठोड,संजय चौधरी,देवेंद्र कळमकर,प्रमोद निंभोरकर,साहेबराव कात्रे,संदीप अढागळे,प्रवीण मुंगळे,देवानंद खंडारे,आशिष प्रधान,शंकर गावंडे,आशिष सोळंकी,स्वप्निल खडसे यांच्यासह आदी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.