दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- राम कराळे
लोहा मागील पंधरा दिवसापासून सतत अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे लोहा तालुक्यातील अंतेश्वर भारसवाडा पेनुर व लोहा परिसरात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये हळद केळी आंबा अशा वार्षिक पिकांचे व ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची गरज आहे लोकप्रतिनिधी शामसुंदर शिंदे साहेब यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत प्रशासनाकडून कुठलेही पंचनामे झालेले नाहीत तरी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला सहकार्य करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे