दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
==========================
लातुर/अहमदपुर: दै चालु वार्ता या महाराष्ट्रातील एकमेव निर्भीड समाज मनाचा वैचारिक कणा असलेल्या पीडित,दिन दुबळ्या, लोकांसाठी आणी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या वृत्तपत्रात कार्यरत असलेल्या सर्कल प्रतिनिधी ते जिल्हा प्रतिनिधी पदापर्यंत आपल्या प्रमाणिक कार्याच्या जोरावर यश मिळवलेल्या एका पत्रकाराचा जीवनप्रवासा बद्दल आणी पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्याबद्दल जाणून घेऊ या
परिचय आणी कार्याची सुरुवात
अहमदपुर तालुक्यातील खरकाडी तांडा(धसवाडी)या छोट्याश्या तांड्यातील राठोड रमेश पंडित सर यांचे प्राथमिक शिक्षण इथेच झाले .लहानपणापासून सर्वसामान्य लोकांसाठी काही तरी वेगळं करण्याची ऊर्जा असणारा विद्यार्थी म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्यांना लहानपणापासून अन्याय ग्रस्ताना न्याय मिळवून देण्याची जिद्द पत्रकारिता या क्षेत्रात घेऊन आली .खर तर ते आपल्या ज्ञानाच्या जोरावर दुसऱ्या क्षेत्रात पण आपला ठसा उमटाऊ शकले असते पण मला माझ्या सारख्या सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढायचच हीच जिद्द घेऊन या क्षेत्रात ते आले.नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी घराण्यातील एक शेतकरी पुत्र पुणे येथे अनेक व्यवसाय असताना जीवनात सर्व काही शेटल असताना सर्वसामान्यांना न्याय तथा ज्यांची इच्छा खरंच गरजूसाठी लढण्याची आहे अशांना परस्थापित आणी प्रशासन अथवा जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी व्यासपीठ आपल्या *दैनिक चालु वार्ता* या वृत्त पत्राच्या माध्यमातून *मुख्य संपादक श्री डी. एस.लोखंडे* पाटील संधी देणार आहेत हे एकूण जनतेला न्याय मिळवून देण्याचा ध्यास घेतलेल्या रमेश पंडित राठोड या खंडाळी सर्कल प्रतिनिधी म्हणून दि:- ०४-०९-२०२१ साली आपल्या पत्रकारिता कार्याला सुरुवात केली.२८जुलै २०२१ ला दैनिक चालु वार्ता वृत्तपत्राची सुरुवात आणी दोन महिन्यातच राठोड सर यांनी दै .चालु वार्ता मध्ये स्वतःला आणी कार्याला सामावून घेतल . श्री डी. एस. लोखंडे पाटील सरांचे मिळालेले मार्गदर्शन आणी पाठिंबा राठोड सर यांची कार्य करण्याची क्षमता या बळावर त्यांनी अनेक प्रकरणाचा छडा लावत जनतेला न्याय मिळवून देत जागृती केली.
बातमीच्या माध्यमातून अनेक प्रकरण उघड करत जनतेला न्याय मिळवून दिले
२७ मार्च २०२२ रोजी खरकाडी तांडा येथील पाणी प्रश्ना बाबतची बातमी “खरकाडी तांडा येथे भिषण पाणी टंचाई ग्रा.पं. चे दुर्लक्ष”, अहमदपुर पाणी पुरवठा दुर्लक्षित, ऍडमिशन फिस घेणाऱ्या शाळेच्या संदर्भात जनतेला न्याय मिळवुन दिले ,सुनेगाव येथील पूल पाण्याने वाहून गेले यावर प्रशासनाचे वेधले लक्ष,किनगाव पोलीस स्टेशन लाईट बंद,दरवाजे बंद,धसवाडी येथील घरकुल घोटाळा,नगरपालिकेच्या मुतारीची अवस्था,उन्हाळी क्लासच्या नावावर होणारी आर्थिक लुट,आरोग्य विभागात होणारी गैरसोय आणी इतर खूप प्रकरणाचा छडा आपल्या बातमीच्या माध्यमातून लावून सामान्यांना न्याय आणी प्रशासनावर वचक अशा प्रकारच कार्य त्यांनी केल.
सर्कल प्रतिनिधी पदावरून अहमदपूर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आणि काही कार्यकाळामध्ये लातूर जिल्हा प्रतिनिधी पर्यंतचा त्यांचा प्रवास यशोमय आहे.
सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित
सन २०२२ साली झालेल्या मुखेड येथील स्नेहसमेलन आणी पुरस्कार सोहळ्यात रमेश राठोड यांना त्यांच्या कार्याची दखल घेत दै चालु वार्ता परिवाराच्या वतीने संपादक श्री डी. एस.लोखंडे पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली राठोड रमेश पंडित यांना सर्वोत्कृष्ट कार्याचा पुरस्काराने मुखेड येथे मेळाव्यात सन्मानित करण्यात आले.
मान्यवर तथा सहकाऱ्यांचे शुभेच्छा पर संदेश
राठोड रमेश हे आमच्या दैनिकाच्या सुरुवातीच्या काळापासून आमच्या सोबत आहेत त्यांची काम करण्याची पध्दत आणी कामाबद्दलचा जिव्हाळा सर्वसामन्यांना न्याय मिळवून देण्याची क्षमता याचाच विचार करून त्यांना जिल्हाभर कार्य करण्याची संधी दिली ते या संधीच सोन करतील हिच अपेक्षा आणी विश्वास त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
श्री.डी. एस.लोखंडे पाटील.संपादक दै.चालु वार्ता
सरांनी आपल्या कामातून उमठवलेला ठसा हा कायम आमच्या साठी प्रेरणादायक असेल.त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
शेख इस्माईल .शिऊर निलंगा प्रतिनिधी
कायम प्रामाणिक कार्य करण्यासाठी धडपडणाऱ्या सहकाऱ्याचा पदोन्नती बद्दल खूप शुभेच्छा
माधव गोटमवाडतालुका प्रतिनिधी कंधार
माझ्या सहकार्याची पदोन्नती खूप आंनददायी आहे कायम त्यांच्या सोबत काम करताना त्यांच्या कार्यातून आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते त्यांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा
विष्णु मोहन पोले दै.चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी आणी संतोषकुमार भसमपुरे रेड्डी(खंडाळी सर्कल)