दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- ई डब्ल्यू एस व उत्पन्न प्रमाणपत्र वेळेवर द्या खुल्या प्रवर्गातील मुलांच्या आयुष्याशी खेळू नका अगोदरच ओपन त्यात आता शासन आपल्या दारीची गोपण याअगोदर उत्पन्न प्रमाणपत्र निघण्यासाठी दोन दिवस लागायचे आता आठ-दहा दिवस लागत आहेत तसेच ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळण्यासाठी आठ दिवस लागत होते आता शासन आपल्या दारी आल्यामुळे २० ते ३० दिवस वाट पहावी लागत आहे आणि पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी अडचण निर्माण होते आहे म्हणजेच एक वर्षे पाण्यात जात आहे प्रवेश प्रक्रिया संपून जात आहे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यासाठी शासनाने पूर्वीप्रमाणे उत्पन्नाचे प्रमाणपत्र दोन दिवसांत देऊन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे मराठा आरक्षण प्रकरण कोर्टात असल्यामुळे मराठ्यांना आरक्षण तर देऊ शकत नाही म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुर्वी प्रमाणे चार दिवसात ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच दोन दिवसात उत्पनाचे प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच तहसील कार्यालयात एक स्वतंत्र अधिकारी बसवून विद्यार्थ्यांना सर्व प्रमाणपत्रे लवकर देण्याची व्यवस्था करावी पण विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करू नये अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व विद्यार्थी करीत आहेत.